AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय महत्त्वाकांक्षेचे बळी, उष्माघात बळी प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा घणाघात

12 वाजताच्या कडक उन्हात काय झालं असेल. लोकांचा विचार करा. त्याच्यात बळी गेले.

राजकीय महत्त्वाकांक्षेचे बळी, उष्माघात बळी प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा घणाघात
| Edited By: | Updated on: Apr 17, 2023 | 8:11 PM
Share

ठाणे : नवी मुंबईतील खारघरमध्ये रविवारी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमात उष्णाघाताने १३ श्रीसेवकांचा बळी गेला. यानंतर विरोधक राज्य सरकारवर सडकून टीका करत आहेत. दुपारीऐवजी हा कार्यक्रम संध्याकाळी घेतला असता तर दुर्घटना टळली असती, अशा चर्चा सुरू झाल्या. संध्याकाळी कार्यक्रम का घेतला नाही, असा आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे. यासंदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, नियोजन शून्य कार्यक्रम झाला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, राजकीय महत्वाकांक्षा आणि अप्पासाहेब यांना पुढे करण्यात आले. त्यांच्या श्रद्धाळू भक्तांना ह्यांना एकत्रित करून आपलं राजकीय गणित जुळवण्यासाठी हे मंडळी उताविळ झाले होते. राजकीय मंडळींनी या १३ श्रीसेवकांचा बळी घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला.

12 वाजताच्या कडक उन्हात काय झालं असेल. लोकांचा विचार करा. त्याच्यात बळी गेले. शरद पवार यांची सभा आम्ही आयोजित केल्या. काहींनी बाळासाहेब यांची सभा आयोजित केल्या. काहींनी नरेंद्र मोदींच्या सभा आयोजित केल्या. या सभा संध्याकाळी 7 ला का आयोजित केल्या जातात?

…तर काय फरक पडला असता

राजकीय सभेना कोणीही १२ वाजता येत नाही. कितीही प्रेमाने बोलवा येतच नाही. येथे श्रद्धेपोटी लोक येणार हे ह्यांना माहिती होतं. त्या श्रध्देमार्फत आपलं गणित जुळवता जुळवता ह्यांनी १३ जणांचे मुडदे पाडले, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी १६ कोटी खर्च केला होता. अजून १६ कोटी खर्च केले असते तर काय फरक पडला असता. १ घरातला एक माणूस जाण्याचे दुःख काय असतं. हे प्रत्येकाने आयुष्यात अनुभवलेले आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

…तर घरी बसून कार्यक्रम बघीतला असता

आतापर्यंत १९ कार्यक्रम झाले. हा २० वा कार्यक्रम झाला. आतापर्यंत छोट्या जागेत कार्यक्रम झाले. आजच्या परिस्थितीत राजभवनाला कार्यक्रम घेतला असता सर्व इलेट्रॉनिक्स मीडियाने दाखवला असता. लोकांनी घरात पंख्याखाली बसून आरामात हा कार्यक्रम बघीतला असता, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

श्रध्देचा वापर आणि त्याचा अतिरेक

एक किलोमीटरच्या अंतरावरून ज्यांना दिला पुरस्कार ते दिसले तरी असतील का. आपल्याला १०० मीटरवर दिसत नाही. श्रध्देचा वापर आणि त्याचा अतिरेक जेव्हा होतो आणि मनात कोणती भावना नसते. अशा घटनांना जे आयोजन करतात तेच जबाबदार असतात, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...