AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कळव्यात आव्हाड आणि श्रीकांत शिंदेंमध्ये निधीवरून जुगलबंदी; जलकुंभाच्या लोकार्पण सोहळ्यात नाराजीनाट्य

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले. गेली दोन वर्षे महापलिकेत निधी उपलब्ध नाही, पालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहेत. त्यामुळे या कामासाठी नगरविकास विभागाने निधी दिला आहे.

कळव्यात आव्हाड आणि श्रीकांत शिंदेंमध्ये निधीवरून जुगलबंदी; जलकुंभाच्या लोकार्पण सोहळ्यात नाराजीनाट्य
कळव्यात आव्हाड आणि श्रीकांत शिंदेंमध्ये निधीवरून जुगलबंदी
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Nov 27, 2021 | 10:54 PM
Share

ठाणे : कळवा परिसरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटवा, यासाठी जलकुंभाची उभारणी करण्यात आली आहे. या जलकुंभाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे. या सोहळ्याची सध्या चर्चा सुरु आहे ती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातील जुगलबंदीची. जलकुंभाला मिळणाऱ्या निधीवरून आव्हाड आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. त्यामुळे जलकुंभाचा उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांना दोन नेत्यांमधील नाराजीनाट्य पाहायला मिळाले.

निधीअभावी कामे खोळंबल्याने आव्हाडांनी व्यक्त केली नाराजी

कळवा, खारेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण होत आहे. या भागाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येच्या पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस अधिक जटिल बनत चालला आहे. नागरिकांच्या घरात वेळेवर पाणी पुरवठा होत नाही. ही समस्या लक्षात घेत स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत होते. मात्र निधीअभावी विकासकामांची गाडी पुढे सरकलेली नाही. विकासकामांना निधी मिळत नसल्यामुळेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जलकुंभच्या लोकार्पण सोहळ्यातच नाराजी व्यक्त केली.

आव्हाडांचा श्रीकांत शिंदेंना टोला

कळवा मुंब्रामधील विकास कामासाठी गेली 2 वर्षे निधी मिळत नसून निधी मिळावा म्हणून मी राज्य सरकार आणि महापलिकेच्या मागे लागलो आहे. मात्र आता कुठेही जाण्यात काही अर्थ नाही, कारण निधी देण्यासाठी ‘पोरासाठी बाप कधीही’ तयार असतो, असा टोला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना लगावला.

आव्हाडांच्या टोमण्याला श्रीकांत शिंदेंचे उत्तर

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिले. गेली दोन वर्षे महापलिकेत निधी उपलब्ध नाही, पालिकेची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहेत. त्यामुळे या कामासाठी नगरविकास विभागाने निधी दिला आहे. आपल्याला आवश्यकता असल्यास नक्कीच नगरविकास विभाग निधी दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी गेले दोन वर्षे मागे लागलोय, विकासकामांसाठी 25 कोटी रुपये द्या, अशी मागणी करतोय. त्यावर आज देतो, उद्या देतो, फाईल गेलेली आहे, असे करत करतच ह्यांना मंत्री बनवून ठेवा, एवढीच विनंती आहे, असा मिश्किल टोला लगावला. त्यामुळे जलकुंभ लोकार्पण सोहळ्यात दोन नेत्यांमधील ही जुगलबंदीच चर्चेचा विषय ठरली. (Dissatisfaction between Shrikant Shinde and Jitendra Awhad at the inauguration ceremony of Jalkumbh)

इतर बातम्या

VIDEO | उल्हासनगरात दारूसाठी पैसे मागत गावगुंडांचा हैदोस; पोलिसांनी त्याच परिसरातून काढली गावगुंडांची ‘वरात’

Thane Sero Survey | ठाण्यात सिरो सर्वेक्षण, 90% हून अधिक जणांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ