
TMC KDMC NMMC UMC Election Results 2026 LIVE : राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या ठाणे जिल्ह्यासह आसपासच्या महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आज निकाल लागत आहे. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि उल्हासनगर या सात मोठ्या शहरांमध्ये कुणाची सत्ता येणार, याचा फैसला आज होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती येऊ लागले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गट आणि महाविकास आघाडीने कडवे आव्हान उभे केले आहे. नवी मुंबईत गणेश नाईकांचे वर्चस्व कायम राहणार की सत्तांतर होणार? कल्याण-डोंबिवलीत कोण बाजी मारणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. प्रत्येक प्रभागाचा निकाल, विजयी उमेदवारांची यादी, पक्षांची बेरीज-वजाबाकी आणि निकालांचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी या लाईव्ह ब्लॉगला रिफ्रेश करत राहा.
कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपला धक्का बसला आहे. भाजपा दुसऱ्या क्रमांकवर घसरली आहे.
एकूण जागा-122
भाजप-48
शिवसेना-52
राष्ट्रवादी-
ठाकरे-10
काँग्रेस-2
मनसे-5
शरद पवार गट-1
इतर-00
ठाण्यातील प्रभाग क्रमांक 3 मतमोजणी केंद्रावर शिवसेना आणि शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार तसेच प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार संजय भोईर यांच्यामध्ये राडा झाला. यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. आता या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस वाढवण्यात आला आहे.
भिवंडी महानगरपालिका
एकुण जागा- 90
भाजप- 22
शिवसेना- 12
राष्ट्रवादी-00
ठाकरे-00
काँग्रेस- 30
मनसे-00
शरद पवार गट-12
इतर-00
कोणार्क विकास आघाडी – 04
भिवंडी विकास आघाडी – 03
समाजवादी पार्टी – 06
अपक्ष – 01
ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग 12 मधून राजन विचारे यांची पत्नी पराभूत झाली आहे. भाजपच्या काजोल गुणीजन यांनी त्यांचा पराभव केला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निकालात कोण किती जागांवर आघाडीवर?
एकुण जागा-122
भाजप-36
शिवसेना-32
राष्ट्रवादी-00
ठाकरे-5
काँग्रेस-2
मनसे-4
शरद पवार गट-1
इतर-00
मी या विजयाने आनंदी आहे. पण पूर्णपणे समाधानी नाही. जनतेने जो विश्वास टाकला आहे, त्या जोरावर दिलेली सर्व आश्वासने मी नक्कीच पूर्ण करणार अशी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरार महापालिकेतील निवडणुकीच्या विजयानंतर दिली
निवडणूक प्रक्रियेत मशीन स्लो झाल्या नसत्या, तर आम्ही १०० पार गेलो असतो. मतदार यादीतील घोळ आणि ईव्हीएममधील तांत्रिक अडचणींमुळे आमच्या काही महत्त्वाच्या जागा गेल्या आहेत. गेल्या ३५ वर्षांपासून माझी दहशत असल्याचे सांगितले जाते. जर असे असेल, तर सर्व यंत्रणा तुमच्याकडे आहेत, खुशाल चौकशी करा. निवडणुकीत फक्त माझीच तथाकथित गुंडागर्दी का दिसते? असा सवाल हितेंद्र ठाकूर यांनी केला.
माझ्या कार्यकर्त्यांच्या अफाट मेहनतीमुळेच आज आमचा विजय झाला आहे. मी केवळ कार्यकर्त्यांच्या जीवावर माझे वर्चस्व दाखवून दिले. मी निवडणुकीसाठी कर्तृत्वान उमेदवार दिले होते. अगदी जनरल जागेवर आदिवासी महिलेला संधी देऊन तिला निवडून आणण्याची किमया आम्ही साधली, अशी प्रतिक्रिया हितेंद्र ठाकूर यांनी दिली
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक २०२६ चे चित्र आता स्पष्ट झाले आहे. ९० जागांसाठी झालेल्या या अटीतटीच्या लढतीत काँग्रेसने ३२ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गटाने १२ जागांवर विजय मिळवत शहराच्या राजकारणात आपली ताकद दाखवून दिली आहे.
| पक्ष / आघाडी | विजयी जागा |
| काँग्रेस | ३२ |
| भाजप | १८ |
| शिवसेना (शिंदे गट) | १२ |
| राष्ट्रवादी (शरद पवार गट) | १२ |
| कोणार्क विकास आघाडी | ०४ |
| भिवंडी विकास आघाडी | ०३ |
| समाजवादी पार्टी | ०२ |
| इतर (मनसे/ठाकरे गट/NCP) | ०० |
| एकूण जागा | ९० |
ठाणे: ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात प्रभाग ४ मध्ये महायुतीने बाजी मारली आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी येथे दणदणीत विजय मिळवला आहे. तर बंडखोर उमेदवारांना मतदारांनी नाकारले आहे.
विजयी उमेदवार
या प्रभागात भाजपच्या मुकेश मोकाशी यांच्या विरोधात विकी पाटील आणि सिद्धार्थ पांडे यांच्या विरोधात नितीन लांडगे यांनी अपक्ष म्हणून बंडखोरी केली होती. मात्र, मतदारांनी अधिकृत उमेदवारांच्या पारड्यात आपले मत टाकत बंडखोरांचे आव्हान मोडीत काढले.
पनवेल महापालिकेच्या एकूण ७८ जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भारतीय जनता पक्षाने (BJP) मोठी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. ७८ पैकी ३३ प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. ११ वॉर्डमध्ये अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर ६ वॉर्डमध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. शेकाप आणि भाजपमध्ये अनेक प्रभागांत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. विशेषतः प्रभाग १ आणि २ मध्ये दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये कांटे की टक्कर आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) १२२ जागांचे निकाल हाती आले असून, भारतीय जनता पार्टी ३२ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने २८ जागा जिंकून आपले वर्चस्व कायम राखले आहे. दुसरीकडे, मनसेने ४ जागांवर विजय मिळवला असून ठाकरे गट आणि काँग्रेसला केवळ २-२ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
पक्षनिहाय विजयी जागा
भिवंडी निजामपूर महानगरपालिका निवडणूक निकालाची आकडेवारी समोर आली आहे. निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस १४ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर भारतीय जनता पार्टीने १३ जागा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाने ३७ उमेदवारांपैकी १२ जागा जिंकून प्रभावी कामगिरी केली आहे.
डोंबिवलीतील चंद्रकांत पाटकर मतमोजणी केंद्राबाहेर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा आणि मतमोजणीत फेरफार केल्याचा गंभीर आरोप उमेदवारांनी केला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे गटासह सुमारे १५ उमेदवार एकत्र आले असून, त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘निवडणूक रद्द करून बॅलेट पेपरवर मतदान घ्या’ अशा घोषणांनी केंद्र परिसर दणाणून गेला आहे. वाढता तणाव पाहता पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.
वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (बविआ) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण ११५ जागांपैकी ७१ जागांवर दणदणीत विजय मिळवून बविआने पालिकेतील आपली सत्ता कायम राखली आहे.
| पक्ष | विजयी जागा |
| बहुजन विकास आघाडी | ७१ |
| भारतीय जनता पक्ष (BJP) | ४३ |
| शिवसेना (शिंदे गट) | ०१ |
| शिवसेना (ठाकरे गट) | ०० |
| काँग्रेस | ०० |
| राष्ट्रवादी (शरद पवार/अजित पवार) | ०० |
| वंचित बहुजन आघाडी | ०० |
| इतर (SP, MIM, AAP, BSP) | ०० |
वसई-विरार शहर महानगरपालिकेचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (BVA) पुन्हा एकदा या क्षेत्रावर आपला बालेकिल्ला सिद्ध केला आहे. बविआने एकूण ६३ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या त्यांच्याकडे असणार आहे. तर भाजपने यंदा चमकदार कामगिरी करत २४ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र, या निवडणुकीत सर्वात मोठा धक्का महाविकास आघाडी आणि इतर प्रादेशिक पक्षांना बसला असून त्यांना आपले खातेही उघडता आले नाही.
| पक्ष | विजयी जागा |
| बहुजन विकास आघाडी (BVA) | ६३ |
| भारतीय जनता पार्टी (BJP) | २४ |
| शिवसेना (शिंदे गट) | ०० |
| शिवसेना (उद्धव ठाकरे गट) | ०० |
| काँग्रेस | ०० |
| राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) | ०० |
| राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) | ०० |
| वंचित बहुजन आघाडी | ०० |
| इतर (SP, MIM, AAP, BSP) | ०० |
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे पक्षनिहाय निकाल समोर आले आहेत. पाहा संपूर्ण आकडेवारी आणि सविस्तर माहिती
| पक्ष | मिळालेल्या जागा |
| भाजप (BJP) | ३२ |
| शिवसेना (शिंदे गट) | २८ |
| मनसे (MNS) | ०४ |
| शिवसेना (ठाकरे गट) | ०२ |
| राष्ट्रवादी (अजित पवार) | ०० |
| काँग्रेस | ०० |
| राष्ट्रवादी (शरद पवार) | ०० |
| इतर | ०० |
| एकूण जागा | १२२ |
ठाणे महानगरपालिका निवडणूक २०२६ चे निकाल आज १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होत आहेत. एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात महायुतीने (शिवसेना शिंदे गट आणि भाजप) वर्चस्व राखल्याचे चित्र प्राथमिक निकालांवरून दिसत आहे.
| प्रभाग क्रमांक | विजयी/आघाडीवर असलेले उमेदवार | पक्ष |
| प्रभाग ४ | स्नेहा आंब्रे, मुकेश मोकाशी, आशा शेरबहादूर सिंह, सिद्धार्थ पांडे | भाजप / शिवसेना (शिंदे) |
| प्रभाग ६ | वनिता घोगरे, सरिता ठाकूर, प्रशांत जाधव, हणमंत जगदाळे | शिवसेना (शिंदे) |
| प्रभाग १० (मुंब्रा) | नजीब मुल्ला, पूनम माळी, वहिदा खान, सुहास देसाई | राष्ट्रवादी (AP) |
| प्रभाग २१ | अर्चना किरण मनेरा (आघाडीवर) | भाजप |
| प्रभाग २२ | सुधीर कोकाटे (आघाडीवर) | शिवसेना (शिंदे) |
| प्रभाग १७ | पूजा ढमाळ (आघाडीवर) | मनसे |
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ चा निकाल अत्यंत धक्कादायक लागला आहे. या प्रभागात मतदारांनी पक्षांतरापेक्षा जुन्याच चेहऱ्यांवर अधिक विश्वास दाखवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
भाजपमधून शिवसेनेत प्रवेश केलेले विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांनी या प्रभागात आपले वर्चस्व कायम राखले असून ते विजयी झाले आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदेश पाटील आणि डॉ. रसिका पाटील यांनीही विजय मिळवत मनसेचा गड राखला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर मनसे सोडून भाजपमध्ये गेलेल्या प्रकाश भोईर यांना मात्र पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. म्हात्रे आणि भोईर यांच्यातील ही लढत प्रतिष्ठेची मानली जात होती.
महानगरपालिका-l कल्याण डोंबिवली
एकुण जागा-122
भाजप-28
शिवसेना-28
राष्ट्रवादी-00
ठाकरे-02
काँग्रेस-00
मनसे-03
शरद पवार गट-00
इतर-00
भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी समोर आली आहे. एकूण ९० जागांपैकी काँग्रेसने १२, भाजपने १० तर शरद पवार गटाने ०८ जागांवर विजय मिळवला आहे. कोणार्क आणि भिवंडी विकास आघाडीने प्रत्येकी ४ जागा जिंकल्या आहेत.
| पक्ष / आघाडी | जागा |
| काँग्रेस | १२ |
| भाजप | १० |
| शिवसेना | ०८ |
| राष्ट्रवादी (शरद पवार गट) | ०८ |
| कोणार्क विकास आघाडी | ०४ |
| भिवंडी विकास आघाडी | ०४ |
| शिवसेना (ठाकरे गट) | ०० |
| राष्ट्रवादी | ०० |
| मनसे | ०० |
| इतर | ०० |
| एकूण जागा | ९० |
प्रभाग क्रमांक 29 या प्रभागातून निवडणूक लढविणारे नितीन पाटील, रवी पाटील आणि त्यांच्या पत्नी रंजना पाटील व रुपाली म्हात्रे यांचा पराभव झाला आहे. विजयाच्या जल्लोषात असतानाच, पराभूत उमेदवारांनी मतमोजणीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्या पत्नी (रुपाली म्हात्रे आणि रंजना पाटील) यांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याचा आरोप केला आहे. “प्रत्येक उमेदवाराचा आकडा मशीनमध्ये सेम (एकसारखा) दिसत आहे, हे कसे शक्य आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे. या आरोपांमुळे मतमोजणी केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या प्रभाग क्रमांक २९ मध्ये भारतीय जनता पक्षाने (BJP) जोरदार मुसंडी मारली आहे. या प्रभागातील चारही जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून विरोधकांना मोठा धक्का बसला आहे.
विजयी उमेदवार (भाजप): १. कविता म्हात्रे २. आर्या नाटेकर ३. अलका म्हात्रे ४. मंदार टावरे
पराभूत उमेदवार: या प्रभागातून निवडणूक लढविणारे नितीन पाटील, रवी पाटील आणि त्यांच्या पत्नी रंजना पाटील व रुपाली म्हात्रे यांचा पराभव झाला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे ताजे निकाल जाहीर झाले आहेत. एकूण १२२ जागांपैकी भाजपला २०, शिवसेनेला १८ तर मनसे आणि ठाकरे गटाला प्रत्येकी २ जागा मिळाल्या आहेत.
| पक्ष | जिंकलेल्या जागा |
| भाजप (BJP) | २० |
| शिवसेना (शिंदे गट) | १८ |
| शिवसेना (ठाकरे गट) | ०२ |
| मनसे (MNS) | ०२ |
| राष्ट्रवादी (अजित पवार) | ०० |
| राष्ट्रवादी (शरद पवार) | ०० |
| काँग्रेस | ०० |
| इतर | ०० |
| एकूण जागा | १२२ |
भिवंडी महानगरपालिकेच्या ९० जागांचे कल हाती आले असून, कोणत्याही एका राजकीय पक्षाला सत्तेची मॅजिक फिगर गाठता आलेली नाही. सध्याच्या आकडेवारीनुसार काँग्रेस १२ जागांसह आघाडीवर आहे, तर भाजप १० जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, शरद पवार गट आणि कोणार्क विकास आघाडीने प्रत्येकी ४ जागा जिंकून आपली उपस्थिती दर्शवली आहे.
पक्षनिहाय विजयी जागा
कल्याणमधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. प्रल्हाद म्हात्रे, रेखा म्हात्रे आणि डॉ. रविना म्हात्रे हे तिघेही आता एकाच महापालिका सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून बसणार आहेत. विशेष म्हणजे, हे तिघेही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या चिन्हावर निवडून आले आहेत.
विजयी उमेदवारांची नावे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग २९ मध्ये अत्यंत चुरशीची लढत अपेक्षित असताना, तिसऱ्या फेरीअखेर काही बड्या नावांना मोठा धक्का बसला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या १२२ जागांचे कल आणि निकाल वेगाने हाती येत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली असून शिवसेना (शिंदे गट) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
| राजकीय पक्ष | विजयी / आघाडी |
| भारतीय जनता पक्ष (BJP) | १६ |
| शिवसेना (एकनाथ शिंदे) | ०९ |
| शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | ०२ |
| मनसे (MNS) | ०२ |
| राष्ट्रवादी (अजित पवार / शरद पवार) | ०० |
| काँग्रेस (INC) | ०० |
| इतर / अपक्ष | ०० |
| एकूण जागा | १२२ |
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून असलेल्या प्रभाग क्रमांक २९ मधून मोठी बातमी समोर येत आहे. मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेर भाजपच्या चारी उमेदवारांनी आपली पकड घट्ट केली असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
भाजपच्या पॅनेलची सरशी: तिसऱ्या फेरीचा कल हाती आला असून यामध्ये भाजपच्या पॅनेलने मोठी आघाडी घेतली आहे. भाजपचे खालील उमेदवार सध्या आघाडीवर आहेत.
वसई-विरारमध्ये पाचव्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये एकतर्फी वाटणाऱ्या या लढतीत आता भाजपने जोरदार मुसंडी मारली असून, आघाडी घेतलेल्या जागांमध्ये मोठी वाढ केली आहे.
| राजकीय पक्ष | जागा (आघाडी/विजयी) |
| बहुजन विकास आघाडी (BVA) | ६५ |
| भारतीय जनता पक्ष (BJP) | ४७ |
| शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) | ०२ |
| काँग्रेस (INC) | ०१ |
| शिवसेना (एकनाथ शिंदे) | ०० |
| इतर (MIM, AAP, BSP, SP) | ०० |
कल्याण-डोंबिवलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दमदार कामगिरी करत दोन जागांवर विजय मिळवला आहे. यात कल्याणमधील एका हाय-व्होल्टेज लढतीचाही समावेश आहे.
विजयी उमेदवार (शिवसेना UBT)
मधुर म्हात्रे (विजयी): मधुर म्हात्रे यांनी माजी उपमहापौर विकी तरे यांचा पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. कल्याणमधील ही सर्वात चर्चेत असलेली लढत होती, जिथे उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली आहे.
कीर्ती ढोणे (विजयी): कीर्ती ढोणे यांनीही आपल्या प्रभागातून विजय मिळवत शिवसेना (UBT) च्या विजयात भर घातली आहे.
डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २१ मधील चुरशीच्या लढतीचा निकाल जाहीर झाला आहे. येथे कोणत्याही एका पक्षाची लाट नसून मतदारांनी तिन्ही वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना पसंती दिली आहे.
प्रभाग २१ – विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग २१ (अ): प्रल्हाद परशुराम म्हात्रे (मनसे) – विजयी
प्रभाग २१ (ब): रवीना राहुल म्हात्रे (भाजप) – विजयी
प्रभाग २१ (क): रेखा जनार्दन म्हात्रे (शिवसेना – शिंदे गट) – विजयी
वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीचा चौथा टप्पा पूर्ण झाला आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने (BVA) सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेत आपले वर्चस्व कायम राखले आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मतमोजणीत आता प्रभागांमधील चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. महत्त्वाच्या प्रभागांमधील ताजी स्थिती खालीलप्रमाणे आहे:
📍 प्रभाग क्रमांक ७ (कल्याण)
कल्याण प्रभाग क्रमांक ७ मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. येथे शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू आहे
विजया पोटे (शिवसेना): आघाडीवर
हेमलता पवार (भाजप): आघाडीवर
📍 पॅनल क्रमांक २०
पॅनल क्रमांक २० मध्ये भारतीय जनता पक्षाने आपली पकड मजबूत केल्याचे दिसत आहे:
शशिकांत कांबळे (भाजप): आघाडीवर
शारदा चौधरी (भाजप): आघाडीवर
📍 प्रभाग क्रमांक २१
प्रभाग २१ मधून मनसेसाठी मोठी आणि सुखद बातमी येत आहे:
प्रल्हाद म्हात्रे (मनसे): तब्बल १००० मतांच्या भक्कम फरकाने आघाडीवर आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे उत्साहाचे वातावरण आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे कल आणि निकाल हाती येत आहेत. सध्याची पक्षनिहाय स्थिती कशी?
| पक्ष | विजयी / आघाडी |
| एकूण जागा | १२२ |
| भाजप (BJP) | ०३ |
| शिवसेना (शिंदे गट) | ०३ |
| मनसे (MNS) | ०४ |
| राष्ट्रवादी (अजित पवार) | ०० |
| शिवसेना (ठाकरे गट) | ०० |
| काँग्रेस (INC) | ०० |
| राष्ट्रवादी (शरद पवार गट) | ०० |
| इतर / अपक्ष | ०० |
भिवंडीत एकूण ९० जागा असून येथे नेहमीप्रमाणे संमिश्र कल पाहायला मिळत आहेत.
मिरा-भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी लढत सुरू आहे. येथे भाजप आणि अपक्ष यांच्यात मुख्य संघर्ष आहे.
भाजप: २२ (आघाडीवर)
शिवसेना (शिंदे गट): ९ (आघाडीवर)
अपक्ष/इतर: १०
उल्हासनगरमध्ये ७८ जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.
वसई-विरारमध्ये एकूण ११५ जागा आहेत. बहुजन विकास आघाडीला (BVA) यावेळी महायुतीकडून मोठे आव्हान मिळत आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील संमिश्र कल पाहायला मिळत आहेत. डोंबिवलीत भाजपने आपली आघाडी टिकवून ठेवली आहे. तर कल्याण ग्रामीण आणि कल्याण पूर्व भागात शिवसेना शिंदे गट आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे.
नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही महत्त्वाच्या जागांवर भाजपने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्या अनुभवाचा भाजपला फायदा होताना दिसत आहे. तर महाविकास आघाडीला येथे संघर्ष करावा लागत आहे.
ठाणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती येत आहेत. ठाण्यात भारतीय जनता पक्षाने आपले खाते उघडले असून, सध्या भाजप ६ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) ९ जागांवर आघाडी मिळवत आपली पकड मजबूत करताना दिसत आहे.
निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, सुरुवातीच्या कलांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडीमधील चित्र स्पष्ट होत आहे.
| महानगरपालिका | भाजप (BJP) | शिवसेना (SHS) | इतर/अपक्ष |
| ठाणे | – | ०७ | – |
| कल्याण-डोंबिवली | १४ | ०६ | – |
| भिवंडी निझामपूर | ०६ | – | – |
| नवी मुंबई | (कल येणे बाकी) | (कल येणे बाकी) | – |
| उल्हासनगर | (कल येणे बाकी) | (कल येणे बाकी) | – |
| मिरा भाईंदर | (कल येणे बाकी) | (कल येणे बाकी) | – |
| वसई विरार | (कल येणे बाकी) | (कल येणे बाकी) | – |
| पनवेल | (कल येणे बाकी) | (कल येणे बाकी) | – |
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात प्रभाग क्रमांक २९ सर्वाधिक चर्चेत आहे. भाजप आणि शिवसेना आमनेसामने असून प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे. हा प्रभाग संवेदनशील असल्याने आणि गेल्या काही दिवसांतील मारहाणीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर येथे कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या १२२ जागांसाठी आज मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. सुरुवातीला टपाल मतदानाचा (Postal Ballot) कौल हाती घेतला जात आहे. त्यानंतर प्रत्यक्ष ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाईल. या निवडणुकीत एकूण १२२ प्रभागांपैकी २० उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत, त्यामुळे आता उर्वरित जागांसाठी चुरस पाहायला मिळत आहे.
मिरा-भाईंदर आणि उल्हासनगरमध्येही सकाळी १० वाजल्यापासून पोस्टल बॅलेटची मोजणी सुरू होईल. भाजप आणि शिंदे सेनेचे वर्चस्व टिकते की महाविकास आघाडी मुसंडी मारते, याकडे सर्वांचे लक्ष पाहायला मिळत आहे.
ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, भिवंडी-निजापूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि उल्हासनगर या ८ महापालिका क्षेत्रांतील पोस्टल मतमोजणीला सकाळी ९:५६ वाजता सुरुवात होणार आहे. लवकरच पहिला कल हाती येणार आहे.
ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल, भिवंडी-निजापूर, मिरा-भाईंदर, वसई-विरार आणि उल्हासनगर या आठ महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे सत्ताधारी महायुतीने भाजप आणि शिंदे गट या निवडणुकीत सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली आहे.
| महानगरपालिका | बिनवरोध उमेदवारांची संख्या |
| कल्याण-डोंबिवली (KDMC) | २१ |
| ठाणे (TMC) | ०४ |
| नवी मुंबई (NMMC) | ०१ |
| पनवेल (PMC) | ०१ |
| वसई-विरार (VVMC) | ०४ |
| मिरा-भाईंदर (MBMC) | ०१ |
| भिवंडी-निजापूर (BNMC) | ०० |
| उल्हासनगर (UMC) | ०० |
निवडणुकीचा निकाल जाहीर होताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था राखली जावी, यासाठी मतमोजणी केंद्रांच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कार्यकर्त्यांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीतही काही बदल करण्यात आले आहेत.
मतमोजणी प्रक्रिया जलद आणि पारदर्शक व्हावी यासाठी पनवेलमध्ये एकूण ६ वेगवेगळ्या केंद्रांवर एकाच वेळी मतमोजणी सुरू केली जाणार आहे. महापालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक केंद्रावर आवश्यक कर्मचारी आणि तांत्रिक यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (१५ जानेवारी) उत्साहात मतदान पार पडल्यानंतर, आता सर्वांचे लक्ष आज लागणाऱ्या निकालांकडे आहे. आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून प्रशासनाने यासाठी जय्यत तयारी केली आहे.
ठाणे महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी काल गुरुवारी १५ जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मानपाडा परिसरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये राजकीय संघर्षाने हिंसक वळण घेतले. ब्रह्मांड येथील सेंट झेवियर्स मतदान केंद्राबाहेर माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि अपक्ष उमेदवार भूषण भोईर यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला.
EVM नेणारी बस अडवली, वाहनांची तोडफोड अन्… ठाण्यात मतमोजणीपूर्वी राडा, नेमकं काय घडलं?https://t.co/dOQ47Yc6TB #Thane
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 16, 2026
ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असल्याने येथे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीला अनुकूल चित्र दिसत आहे.
मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच कल्याण-डोंबिवली महापालिकेत महायुतीने २० जागांवर बिनविरोध विजय मिळवत मोठी आघाडी घेतली आहे. यात भाजपचे १४ आणि शिवसेनेचे (शिंदे गट) ६ उमेदवार विजयी झाले आहेत.
ठाणे महापालिकेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. शहरात एकूण ११ ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, सकाळी १० वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होईल. तब्बल ९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होत असलेल्या या निवडणुकीत ३३ प्रभागांमधील १३१ जागांसाठी ६४१ उमेदवार रिंगणात आहेत. यंदा ५५.५९% मतदान झाले असून, २०१७ च्या तुलनेत यात ३% घट झाली आहे. या घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला बसणार आणि ठाणेकर सत्तेची किल्ली कोणाच्या हाती देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये २०१७ साली म्हणजेच जवळपास ८ वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकांचे निकाल पाहाता भारतीय जनता पक्ष (BJP) पक्ष ३२ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. शिवसेना (SS) पक्षाला २५ जागा मिळाल्या. तिसऱ्या स्थानी भारताची धर्मनिरपेक्ष आघाडी पक्ष राहिला. त्यांना ११ जागा जिंकता आल्या.
| पक्षाचे नाव | जागांची संख्या |
|---|---|
| भारतीय जनता पक्ष (BJP) | ३२ |
| शिवसेना (SS) | २५ |
| भारताची धर्मनिरपेक्ष आघाडी | ११ |
| राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) | ४ |
| रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) | २ |
| राष्ट्रीय समाज पक्ष | १ |
| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) | १ |
| पीपल्स रिपब्लिकन पार्टी (RPI) | १ |
| भारिप बहुजन महासंघ (BBM) | १ |
| एकूण जागा | ७८ |
२०१७ मध्ये वसई विरार महानगरपालिकेच्या ११५ वॉर्डमधील ११५ जागांसाठी निवडणूक झाली होती. त्या निवडणुकीत विविध पक्षांना खालीलप्रमाणे यश मिळाले होते. २०१७ साली या महानगरपालिकेत घेण्यात आलेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी (BVA) पक्षाने १०६ जागांसह विजयी बहुमत प्राप्त केले. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर ५ जागांसह शिवसेना (SS) पक्षाची कामगिरी राहिली.
| पक्षाचे नाव | जागांची संख्या |
|---|---|
| बहुजन विकास आघाडी (BVA) | १०६ |
| शिवसेना (SS) | ५ |
| स्वतंत्र | २ |
| भारतीय जनता पक्ष (BJP) | १ |
| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) | १ |
| महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) | ० |
| इतर नोंदणीकृत पक्ष | ० |
| रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) | ० |
| एकूण जागा | ११५ |
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेत सत्ता कोणाची असणार, हे ‘मॅजिक फिगर’वर (बहुमताचा आकडा) अवलंबून असते.
| तपशील | संख्या |
| एकूण वॉर्ड (Wards) | २३ |
| एकूण प्रभाग/जागा (Total Seats) | ९० |
| बहुमतासाठी आवश्यक जागा (Magic Figure) | ४६ |
मीरा-भाईंदर महानगरपालिकेत एकूण २४ वॉर्ड असून त्यांतर्गत ९५ प्रभाग विभागलेले आहेत. यानुसार एकूण ९५ नगरसेवक निवडून येतात. या महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला ४८ किंवा त्यापेक्षा जास्त जागा जिंकणे आवश्यक आहे.
भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेमध्ये एकूण २३ वॉर्ड आहेत. या वॉर्डांतर्गत एकूण ९० प्रभाग (जागा) येतात. म्हणजेच भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेमधून संपूर्ण शहरातून एकूण ९० नगरसेवक निवडून दिले जातात.
भिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक २०१७ मध्ये जवळपास ८ वर्षांपूर्वी निवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकांचे निकाल पाहाता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) पक्ष ४७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भारतीय जनता पक्ष (BJP) पक्षाला २० जागा मिळाल्या. तिसऱ्या स्थानी शिवसेना (SS) पक्ष राहिला. त्यांना १२ जागा जिंकता आल्या.
| पक्षाचे नाव | जागांची संख्या |
|---|---|
| भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) | ४७ |
| भारतीय जनता पक्ष (BJP) | २० |
| शिवसेना (SS) | १२ |
| कोणार्क विकास आघाडी | ४ |
| रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावाडी (RPI) | ४ |
| समाजवादी पक्ष (SP) | २ |
| स्वतंत्र | १ |
| एकूण जागा | ९० |
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत काल पार पडलेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी स्पष्ट झाली आहे. एकूण १४,२५,०८६ मतदारांपैकी ५२.११ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचा उत्साह काहीसा कमी दिसून आला.
कल्याण-डोंबिवलीत एकूण ८ ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. पोलिसांनी मतमोजणी केंद्रांच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या प्रशासन पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे.
काल पार पडलेल्या मतदानात केडीएमसी क्षेत्रात एकूण ५२.११ टक्के इतके मतदान झाले आहे. केडीएमसीच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ४९० उमेदवार उतरले आहेत. आज त्यांचे भवितव्य बाहेर येणार आहे. एकूण १२२ प्रभागांपैकी २० जागांवर आधीच बिनविरोध निवड झाली असल्याने उर्वरित जागांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कल्याण-डोंबिवलीत मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या १०२ प्रभागांसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासूनच कल्याण पश्चिम येथील मुंबई विद्यापीठ केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले असून, थोड्याच वेळात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल.
ठाणे महापालिकांची प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.
| प्रभाग समिती | प्रभाग क्रमांक | मतदानाची टक्केवारी (%) |
| माजिवडा | १, २, ३, ८ | ५४.७५% |
| वर्तकनगर | ४, ५, ७ | ५४.८६% |
| लोकमान्य सावरकरनगर | ६, १३, १४, १५ | ५८.०९% |
| वागळे | १६, १७, १८ | ५५.५३% |
| नौपाडा कोपरी | १९, २०, २१, २२ | ५९.७९% |
| उथळसर | १०, ११, १२ | ६०.६०% |
| कळवा | ९, २३, २४, २५ | ५४.२९% |
| मुंब्रा | २६, ३१ | ४७.५९% |
| मुंब्रा | ३०, ३२ | ४९.१५% |
| दिवा | २७, २८ | ५७.३७% |
| दिवा | २९, ३३ | ५६.४५% |
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरूवारी 15 जानेवारी 2026 रोजी झालेल्या मतदानाच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण 55.59 टक्के मतदान झाले असल्याची माहिती आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी दिली. ठाणे महानगरपालिकेच्या एकूण 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्रावर गुरूवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या 33 प्रभागांमध्ये 8 लाख 63 हजार 879 पुरूष, 7 लाख 85 हजार 831 महिला आणि 159 इतर असे एकूण 16 लाख 49 हजार 869 मतदार होते. त्यापैकी 483698 पुरूष , 433385 स्त्री आणि 40 इतर असे एकूण 917123 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचा (BVA) गड समजल्या जाणाऱ्या वसई-विरारमध्ये महायुतीने यावेळी तगडे आव्हान दिले आहे. बहुजन विकास आघाडी आपला बालेकिल्ला राखणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच एक्झिट पोलच्या आकड्यांवरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. बहुतेक एक्झिट पोलनुसार (Axis My India आणि JVC), ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईत महायुतीला (भाजप + शिवसेना – एकनाथ शिंदे) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.
ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीसह सर्वत्र सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.
ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीसह २९ महानगरपालिकांच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. २३ केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे गुलाल कोण उधळणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका निवडणुकीचे पक्षीय बलाबल आणि बहुमताचे आकडे. कोणत्या पक्षाला किती जागांची गरज?
| महानगरपालिका | एकूण जागा | बहुमताचा आकडा | विशेष टिप्पणी |
| ठाणे (TMC) | १३१ | ६६ | ४ जागांवर महायुती आधीच बिनविरोध |
| कल्याण-डोंबिवली (KDMC) | १२२ | ६२ | २० जागांवर महायुती बिनविरोध (भाजप १४, शिवसेना ६) |
| नवी मुंबई (NMMC) | १२२ | ६२ | गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला |
| पनवेल (PMC) | ७८ | ४० | भाजपचा बालेकिल्ला राखण्याचे आव्हान |
| मिरा-भाईंदर (MBMC) | ९५ | ४८ | महायुती आणि अपक्षांमध्ये मोठी चुरस |
| उल्हासनगर (UMC) | ७८ | ४० | स्थानिक आघाड्यांची भूमिका निर्णायक |
ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील ८ महापालिकांच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणी केंद्रांच्या १०० मीटर परिसरात जमावबंदी लागू असणार आहे. सीसीटीव्ही आणि निमलष्करी दलाच्या देखरेखीखाली मतमोजणीची तयारी करण्यात आली आहे.
ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतील मतमोजणी केंद्रांवर निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आगमन सुरु झाले आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तात काही वेळातच स्ट्राँग रूम उघडल्या जाणार आहेत.
आज राज्याच्या २९ महापालिकांचे निकाल जाहीर होणार आहे. ठाण्यात एकनाथ शिंदे तर नवी मुंबईत गणेश नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळी १० वाजल्यापासून सुरुवातीचे कल हाती येण्यास सुरुवात होईल.
मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असताना अनेक ठिकाणी महायुतीचे उमेदवार किंग ठरले आहेत. कल्याण-डोंबिवली (KDMC) मध्ये तब्बल २० जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात भाजपचे १४ आणि शिंदे गटाच्या ६ उमेदवारांचा समावेश आहे. तसेच ठाण्यातही ४ जागांवर महायुतीने मतदानाआधीच खाते उघडले आहे.
काल पार पडलेल्या मतदानाची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे.
KDMC Mahapalika Election Results : KDMC २०१५ निकाल : शिवसेना-भाजप युतीची सत्ता; कल्याण-डोंबिवलीत गेल्या वेळी कोणाला किती जागा मिळाल्या होत्या?
ठाणे महानगरपालिका २०१७ चे चित्र: शिवसेनेचा बालेकिल्ला! २०१७ च्या निवडणुकीत ठाण्यात शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवली होती. तेव्हाचे पक्षनिहाय बलाबल
NMMC Election Results 2026 LIVE : नवी मुंबई महानगरपालिकेच्या २०१५ च्या निवडणुकीत गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने बाजी मारली होती
Thane, KDMC, Navi Mumbai Municipal Election 2026 : ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, मिरा-भाईंदर या महत्त्वाच्या महापालिकांच्या मतदानानंतर आज निकाल जाहीर होणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यंदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतरचा हा पहिलाच मोठा स्थानिक निकाल असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे.
Thane, NMMC, KDMC LIVE Updates : ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि वसई-विरार या पाच महत्त्वाच्या महानगरपालिकांचे भवितव्य आज स्पष्ट होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. महायुती आपला गड राखणार की महाविकास आघाडी मुसंडी मारणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.