AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC: खराब कामगिरीनंतर पाकिस्तानची पहिली विकेट पडली, कर्णधार-प्रशिक्षकाबाबत लवकरच निर्णय

T20 World Cup Pakistan failure: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी नाटकं करणाऱ्या पाकिस्तान संघाची पुरती वाट लागली आहे. या स्पर्धेत सर्व काही मनासारखं मिळूनही स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा संताप झाला आहे.

T20 WC: खराब कामगिरीनंतर पाकिस्तानची पहिली विकेट पडली, कर्णधार-प्रशिक्षकाबाबत लवकरच निर्णय
T20 WC: खराब कामगिरीनंतर पाकिस्तानची पहिली विकेट पडली, कर्णधार-प्रशिक्षकाबाबत लवकरच निर्णयImage Credit source: ICC Twitter
| Updated on: Mar 03, 2026 | 5:32 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी पाकिस्तान संघाबाबत बरीच चर्चा रंगली होती. ऑस्ट्रेलियाला 3-0 ने मात दिल्याने छाती बेडकीसारखी फुगली होती. त्यानंतर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सुरूवातीचे दोन सामने जिंकल्याने पार हवेत गेले होते. पण साखळी फेरीतील तिसर्‍या भारतीय संघाने हवा काढली. त्यानंतर सुपर 8 फेरीत जागा मिळवली. पण या फेरीत निराशाजनक कामगिरी केल्याने उपांत्य फेरीपूर्वीच पत्ता कट झाला. पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून आऊट झाल्यानंतर पीसीबीचा संताप झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता पाकिस्तान संघाची शस्त्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक खेळाडूला 50 लाखांचा दंड ठोठावला आहे. इतकंच काय तर पाकिस्तान निवड समितीत असलेल्या अलीम दार यांनीही राजीनामा दिल्याचं वृत्त आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाच्या निवड समितीचे प्रमुख सदस्य आणि माजी आंतरराष्ट्रीय पंच अलीम दार यांची ऑक्टोबर 2024 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. पण टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुमार कामगिरीनंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. इतर काही वृत्तांनुसार, पीसीबीनेच अलीम दार यांना या पदावरून काढून टाकल्याचं सांगितलं जात आहे. आता टी20 संघात काही महत्त्वाचे बदल होणार हे जवळपास निश्चित आहे. बाबर आझमचं टी20 क्रिकेट करिअर आता संपल्यातच जमा आहे. तर शाहीन शाह आफ्रिदीला टी20 संघात जागा मिळेल की नाही हे सांगणं कठीण आहे. दुसरं सलमान आघाकडून कर्णधारपद काढून घेतलं जाण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं गणित चुकलं..

पाकिस्तानचा सुपर 8 फेरीतील शेवटचा सामना हा श्रीलंकेविरुद्ध झाला. या सामन्यात विजयासोबत नेट रनरेटचं गणित सोडवायचं होतं. पण तसं झालं नाही. पाकिस्तानने हा सामना 5 धावांनी जिंकला. हा सामना पाकिस्तानला किमान 64 धावांनी जिंकायचा होता. त्यासाठी पाकिस्तानने 200 पार धावाही केल्या होत्या. पण सुमार गोलंदाजीमुळे पाकिस्तानला श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत करण्यास अपयश आलं. शेवटच्या षटकात 27 धावांची आवश्यकता होता. यावेळी शाहीन आफ्रिदीने 22 धावा दिल्या. पहिल्या चेंडूवर चौकार आणि सलग तीन षटकार मारले. त्यामुळे सामना 2 चेंडूत 5 धावा असा आला. पण दोन्ही चेंडू निर्धाव गेले.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक