AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतच ऑस्ट्रेलियाचं आव्हान का संपलं? आता ट्रेव्हिस हेडने सांगितलं खरं कारण

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीतच बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान संपुष्टात आलं होतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला होता. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियन संघावरही टीकेची झोड उठली होती. असं असताना ट्रेव्हिस हेडने नेमकं काय झालं ते सांगितलं.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतच ऑस्ट्रेलियाचं आव्हान का संपलं? आता ट्रेव्हिस हेडने सांगितलं खरं कारण
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतच ऑस्ट्रेलियाचं आव्हान का संपलं? आता ट्रेव्हिस हेडने सांगितलं खरं कारणImage Credit source: PTI
| Updated on: Mar 03, 2026 | 6:03 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाने सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं. या स्पर्धेतील साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. साखळी फेरीत श्रीलंका आणि झिम्बाब्वेने पराभवाची धूळ चारली आणि सुपर 8 फेरीचं स्वप्न भंगलं. या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघ प्रबळ दावेदारांपैकी एक गणला जात होता. पण साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं गेलं. यामुळे ऑस्ट्रेलियन क्रीडाप्रेमींनी संघावर टीकास्त्र सोडलं. ऑस्ट्रेलियन संघाला टी20 फॉर्मेटचं काहीच पडलं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतकंच काय रिकी पॉन्टिंगसारख्या दिग्गज क्रिकेटपटूनेही ऑस्ट्रेलियन संघाचे वाभाडे काढले. असं असताना या स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर ट्रेव्हिस हेडने आपलं मत मांडलं आहे. तसेच चाहत्यांनी असा विचार चुकीचं असल्याचं सांगितलं आहे. या स्पर्धेत संघ विजयाच्या दृष्टीने प्रयत्न करत होता असं सांगितलं.

ट्रेव्हिस हेडने नुकताच एडिलेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी हेडने सांगितलं की, खेळाडू आणि संघाचा दृष्टीकोन प्रत्येक गोष्टीसाठी 100 टक्के होता. असा कोणता फॉर्मेट त्यापेक्षा मोठा आहे असं नाही. तुम्ही वर्ल्डकप खेळत असतो तेव्हा काही वेगळा विचार करतो असं नाही. शक्य तितके सर्वोत्तम नियोजन करतो. मला वाटते की बहुतेक लोकांना असं वाटतं की टी20 क्रिकेटपेक्षा कसोटी क्रिकेटला प्राधान्य देतो. ऑस्ट्रेलिया संघाला या स्पर्धेत पुढे न गेल्याचं दु:ख आहे. जेव्हा संघ पराभूत होतो तेव्हा बहुतांश लोकं टीका करतात. आम्ही या वर्ल्डकपमध्ये चांगलं क्रिकेट खेळलो नाही. प्रत्येक खेळाडूकडे चांगली कामगिरी करण्याची संधी होती. पण असं काही झालं नाही. पण आम्ही संघ म्हणून पूर्णपणे वचनबद्ध होतो.

ट्रेव्हिस हेडने सांगितलं की, आयसीसी स्पर्धांमध्ये वेगळी आव्हानं असतात. पण ऑस्ट्रेलियाने काही चांगल्या संधी गमवल्या हे देखील खरं आहे. आम्ही याबाबत चर्चा केली आहे. वर्ल्डकप आणि स्पर्धांबाबत विचारविनिमय केला आहे. आम्ही अशी परिस्थिती हाताळण्यात सक्षम आहोत, आशा आहे की येणाऱ्या आयसीसी स्पर्धेत चांगली कामगिरी करू.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक