AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले ओबीसी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

गुरुवारी ओबीसी एकीकरण समितीने राष्ट्रपतींना पत्र पाठवून कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसेच त्यांना राज्यपाल पदावरून पायउतार करावे, अशी मागणी केली आहे. त्यातच ते आज ठाण्यात येत असल्याने त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याची तयारी ओबीसी कार्यकर्त्यांनी केली होती.

राज्यपालांविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले ओबीसी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
राज्यपालांविरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात असलेले ओबीसी कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: Mar 05, 2022 | 12:23 AM
Share

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्‍या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांच्या ठाणे दौर्‍यादरम्यान निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले. छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्या विरोधात विविध संघटनांनी आंदोलनाचे इशारे दिले आहेत. गुरुवारी ओबीसी एकीकरण समितीने राष्ट्रपतींना पत्र पाठवून कोश्यारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसेच त्यांना राज्यपाल पदावरून पायउतार करावे, अशी मागणी केली आहे. त्यातच ते आज ठाण्यात येत असल्याने त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याची तयारी ओबीसी कार्यकर्त्यांनी केली होती. (Police arrest OBC activists in protest against governor)

मात्र, आंदोलनाच्या आधीच ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले, काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर, रिपाई एकतावादीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, काँग्रेस ओबीसी सेलचे ठाणे शहर अध्यक्ष राहुल पिंगळे, पप्पू मोमीन, अभिषेक पुसाळकर यांना ठाणेनगर तर राज राजापूरकर यांना कासारवडवली पोलिसांनी ताब्यात घेतले. राज्यपाल मुंबईला रवाना झाल्यानंतर या सर्वांची सुटका करण्यात आली.

राज्यपाल मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यावर सुटका

ठाणे नगर पोलिसांनी obc समाजाच्या काही आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. राज्यपाल मुंबईच्या दिशेने रवाना झाल्यानंतर 5 ते 6 जणांची सुटका करण्यात आली. राज्यपाल यांनी केलेल्या वक्तव्यावर जोपर्यंत महाराष्ट्रची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही राज्यपाल यांचा निषेध करत आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

राज्यपालांच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडकडूनही निषेध

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेले बेताल वक्तव्य केले होते. दरम्यान त्यांची पाठराखण करणारे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. त्यामुळं संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेड वाशिम जिल्ह्याच्या वतीने स्थानिक पुसद नाका परिसरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (Police arrest OBC activists in protest against governor)

इतर बातम्या

Special Lecture Series : चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने विशेष व्याख्यानमालेचे आयोजन

TMC Corporator : ठाणे महापालिका नगरसेवकांचा कार्यकाळ संपला, उद्यापासून प्रशासकीय राजवट सुरू

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली