AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मणीपूर ते मुंबई, विद्यार्थ्यांनी सांगितली थरारकथा, अंगावर काटे उभा करणारा प्रसंग

त्या भागामध्ये हिंसाचार सुरू असताना संपूर्ण इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आली होती. मात्र अखेर आम्हाला मदत मिळाली आणि आम्ही मुंबईमध्ये पोचलेलो आहोत.

मणीपूर ते मुंबई, विद्यार्थ्यांनी सांगितली थरारकथा, अंगावर काटे उभा करणारा प्रसंग
| Edited By: | Updated on: May 08, 2023 | 11:15 PM
Share

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. राज्यातील विद्यार्थी मणीपूरच्या हॉस्टेलमध्ये अडकलेले होते. मात्र महाराष्ट्रातील विद्यार्थी सर्व मुंबईमध्ये सुखरूपरीत्या पोचलेले आहेत. या विद्यार्थ्यांसोबत आपण संवाद चाललेला आहे. त्यांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत नेमका काय प्रकार घडलेला आहे. मधुरेखा इंदूरकर म्हणाली, मी स्पोर्ट्समध्ये असून आता त्या ठिकाणी स्पोर्ट्सच्या मानसशास्त्राचा अभ्यास करत आहे. गेल्या तीन दिवसांपासून आम्ही खूप मोठे हिंसाचारामध्ये अडकलो होतो. मात्र आम्हाला आमचे जुनिअर कलिग यांनी फार मदत केली. आम्हाला त्या ठिकाणी खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र सर्व विद्यार्थी महाराष्ट्रातील एका हॉस्पिटलमध्ये होतो. त्यामुळे धीर मिळत होता. आम्ही सुरुवातीला मणीपूरमधील शिक्षकांसोबत मदतीची याचना केली.

मात्र त्या शिक्षकांनी सरकारची तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना आपल्या राज्यातील सरकारची मदत घेऊ शकता, असे आश्वस्त केलेले होते. त्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने पालकांसोबत सुरुवातीला संपर्क साधला. त्यानंतर पालकांनी आम्हाला धीर दिला. आजोबा चालत असताना आम्हाला 24 तास होऊन अधिक वाट पहावी लागली.

कारण त्या भागामध्ये हिंसाचार सुरू असताना संपूर्ण इंटरनेट सेवा ही बंद करण्यात आली होती. मात्र अखेर आम्हाला मदत मिळाली आणि आम्ही मुंबईमध्ये पोचलेलो आहोत. अनेक दिवसांपासून आम्ही संकटात होतो. मात्र आज आम्ही राज्य सरकारच्या आभार मानत आहोत. घरी गेल्यानंतर आईच्या हातचे जेवण करणार आहे.

फाल्गुन महाजन म्हणाला, मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. ज्या परिस्थितीला आम्हाला सामोर जावं लागलं ती परिस्थिती मी तुम्हाला सांगतोय. तीन तारखेला मणीपूरमध्ये हिंसाचार सुरू झाला. आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आलं की तुम्ही होस्टेलच्या रूममध्येच राहा. तुम्ही कॉरिडॉरमध्ये देखील जाऊ नका. कारण की आमच्या कॉरिडॉरबाहेरच या ठिकाणी गोळीबार सुरू होता. मी स्वतः माझ्या खिडकीतून पाहीलं. बाहेर एनएसजी कमांडो असतील. मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली जात होती.

आम्ही खूप घाबरलो होतो. मी माझ्या मित्राचा मोबाईल घेतला. या मोबाईलच्या माध्यमातून मी माझ्या वडिलांना संपर्क केला. मी महाराष्ट्रातून भुसावळ या परिसरात राहतो. माझ्या वडिलांनी तात्काळ संजय सावकारे या नेत्याशी संपर्क साधला. आम्हाला आश्वस्त करण्यात आले की तुम्ही पुढील 24 तासात मुंबई दाखल व्हालं. नेत्यांनी आम्हाला खूप मदत केली. आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.