AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : दिवसाची सुरुवात कशी करावी? पाहा चाणक्य काय सांगतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी केवळ नातेसंबंध कसे असावेत? याबद्दलच लिहिलेलं नाही तर व्यक्तीची दिनचर्या कशी असावी? या संदर्भात देखील मार्गदर्शन केलं आहे.

Chanakya Niti : दिवसाची सुरुवात कशी करावी? पाहा चाणक्य काय सांगतात?
chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 11, 2026 | 8:42 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये फक्त मानवी जीवनातील नातेसंबंधांवरच लिहिलेलं नाही, अथवा फक्त माणसाने आपल्या आयुष्यात आर्थिक नियोजन कसं करावं? एवढंच सांगितलं नाही तर चाणक्य हे आपल्या आरोग्याप्रति देखील प्रचंड जागृत होते, असं त्यांच्या चाणक्य नीती या ग्रंथामधून दिसून येतं. चाणक्य म्हणतात तुमच्याकडे भलेही एकवेळ पैसा नसेल तरी चालेल परंतु तुमचं आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही पैसा कधीही कमावू शकतात. तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकतात. परंतु जर तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे, मात्र आरोग्य नाही, अशावेळी मात्र तुम्ही कधीही जीवनाचा आनंद घेऊ शकत नाहीत. तुमच्या उत्तम आरोग्याचं रहस्य हे तुमच्या दिनचर्येत दडलं आहे, असं चाणक्य सांगतात. तसेच मानसाने दिवसाची सुरुवात कशी करावी? याबद्दल देखील त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

रोज सकाळी उठा – चाणक्य म्हणतात तुम्हाला जर आयुष्यात कायम आरोग्यदायी राहायचं असेल तर सकाळी लवकर झोपेतून उठण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. माणसाने नेहमी सकाळी सूर्योदयापूर्वी झोपेतून उठावं. जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठतो, असा व्यक्ती आयुष्यभर निरोगी आणि उत्साही राहतो. असा व्यक्ती कधीही लवकर आजारी पडत नाही, तसेच जो व्यक्ती रात्री लवकर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो त्यांचा संपूर्ण दिवस चांगला जातो. त्याच्या मनात दिवसभर उत्साह टिकून राहातो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कामाचं नियोजन – चाणक्य म्हणतात सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वात प्रथम इश्वराचं नामस्मरण करा, त्याचे आभार माना आणि त्यानंतर तुम्हाला आज दिवसभरात कोणती कामं करायची आहेत? तसेच त्यांचा प्राधान्य क्रम काय आहे? कोणती कामे आधी करायची आहेत? कोणती नंतर करायची आहे? या सर्व गोष्टीचं नियोजन करा आणि त्यानुसार कामाला लागा.

व्यायाम – चाणक्य म्हणतात उत्तम शरीर ही कोणत्याही मानसाची फार मोठी संपत्ती असते, तुम्ही व्यायामातून आरोग्य कमावू शकतात. त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर थोडा तरी वेळ हा व्यायामाला दिलाच पाहिजे. व्यायामामुळे तुमचं शरीर सशक्त राहतं, कामातील उत्साह वाढतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?