AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात दहावी, बारावीचे वर्ग सुरू राहणार, शाळांबाबत नवी नियमावली काय? वाचा सविस्तर

ठाणे : मुंबई, ठाण्यात कोरोनाचा कहर वाढल्याने शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा आणि अकरावीचे वर्गही बंद राहणार आहेत, तर दहावी आणि बारावीचे वर्ग सुरूच राहणार आहेत.

ठाण्यात दहावी, बारावीचे वर्ग सुरू राहणार, शाळांबाबत नवी नियमावली काय? वाचा सविस्तर
school student
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 7:58 PM
Share

ठाणे : मुंबई, ठाण्यात कोरोनाचा कहर वाढल्याने शाळांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा आणि अकरावीचे वर्गही बंद राहणार आहेत, तर दहावी आणि बारावीचे वर्ग सुरूच राहणार आहेत. ओमिक्रोन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार संसर्ग रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 10 वी व 12 वी चे वर्ग वगळता अन्य वर्गासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाठी दिनांक 31 जानेवारी 2022 पर्यंत बंद ठेवून ऑनलाईन पध्दतीने वर्ग सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली आहे.

कोणते वर्ग सुरू कोणते बंद?

सद्यस्थितीत सर्वत्र ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा वाढता प्रभाव व कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी व 11 वीच्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळा दिनांक 4 जानेवारी 2022 ते 31 जानेवारी 2022 पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येत आहेत. तर 10 वी व 12 वीचे नियमित वर्ग सुरूच राहणार आहे.

यामध्ये इयत्ता 1 ली ते इयत्ता 9 वी व 11 वी या वर्गातील विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने वर्ग सुरू राहणार आहे. दरम्यान ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील शाळेतील 15 ते 18 वर्षे वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांचे नियोजनानुसार लसीकरण सुरू राहणार आहे. याकरिता महापालिका शाळांसह अन्य खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणाऱ्या 15 ते 18 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी शाळेत बोलविण्यात येणार आहे. तरी कोरोनाचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने 15 ते 18 वयोगटासाठी सुरू करण्यात लसीकरण मोहिमेंतर्गत विद्यार्थ्यांनी जवळच्या लसीकरण केंद्रात जावून लस घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

शिक्षणमंत्र्यांकडून शाळा आणि लसीकरणाचा आढावा

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत राज्यातील शाळा आणि लसीकरणाचा आढावा घेतला. या बैठकीत कोरोना स्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्यातील शाळा बंद न करता नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.

सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून 12 दिव्यांग जोडप्यांचा अनोखा विवाह सोहळा, धनंजय मुंडेंचीही मोठी घोषणा

Chhagan Bhujbal | …म्हणून राज्यपालांना निमंत्रण दिलं नाही – छगन भुजबळ

कोरोनाचा कहर लसीकरणावर भर, प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण झालं पाहिजे-आदित्य ठाकरे

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.