काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार, कसा असेल कार्यक्रम?; वाचा…

Balasaheb Thorat on Congress Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात कधी प्रवेश करणार? हा सगळा कार्यक्रम कसा असेल?; शिंदे गटातील नेत्यांच्या हमरीतुमरीवर काँग्रेसची प्रतिक्रिया; म्हणाले, यांनी सरकारची प्रतिमा पूर्णपणे... वाचा सविस्तर बातमी...

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार, कसा असेल कार्यक्रम?; वाचा...
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 10:57 AM

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, ठाणे | 02 फेब्रुवारी 2024 : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. ही यात्रा लवकरच महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. हा सगळा कार्यक्रम कसा असेल? याबाबत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली आहे. राहुल गांधी यांची न्याय यात्रा सुरू आहे. 12 तारखेला गुजरातनंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहे. त्यानंतर धुळे, मालेगाव, नाशिक आणि आपल्या या मार्गाने जे वाडा मार्गाने ते आपल्याकडे येते आहे. 16 तारखेला सकाळी सुरुवात झाल्यानंतर भिवंडीच्या मुक्कामातच 16 तारखेला ते संवाद करतील. ठाण्यात जांभळी नाका येथे सकाळी राहुल गांधी याची 16 तारखेला स्टेज नसणारी सभा होणार आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

“न्याय मागणारी न्याय यात्रा”

भारत जोडो न्याय यात्रा ही मुलुंडला थांबणार दादर चैत्यभूमी या ठिकाणी समारोप असणार आहे. 17 तारखेला सार्वत्रिक मीटिंग आघाडी म्हणून मुंबईला घेण्यात येणार आहे. देशामधील ज्या पद्धतीचे वातावरण सुरू आहे. त्यासाठी ही विशेष यात्रा आहे. 2014 पासून मोदी कारभार करत आहे, देशापुढे अनेक प्रश्न आहेत. लोकशाहीवर आघात होत आहे. या सर्व गोष्टीवरती न्याय मागणारी न्याय यात्रा आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

मित्र पक्षांनाही आमंत्रण- थोरात

ज्या ठिकाणी अडचणी आहेत. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. मोदी यांच्या अनेक सभा सुरू आहे. मात्र मणिपूरमध्ये जाऊ शकले नाही. राजकारण आणि सत्ता डोळ्यासमोर ठेवून सर्व भारतीय जनता पक्षाच कार्यपद्धती दिसत आहे. रॅलीमध्ये आणि पब्लिक मिटिंगसाठी मित्र पक्षांना आम्ही आमंत्रण दिलं आहे, असं थोरात म्हणाले. देश हा सर्वांचा आहे. लोकशाहीमध्ये संवाद साधण्याचा राहुल गांधी ठाण्यात साधणार आहे. तरुण पिढी मोठ्या संख्येने येणार आहे, असंही ते म्हणाले.

संवाद सभा होणार

16 तारखेला राहुल गांधी ठाण्यातील जांभळी नाका या ठिकाणी संवाद साधणार आहेत. भिवंडीतुन सुरुवात होणार आहे. मणिपूर वाईट इतिहास आहे. महागाई वाढलेली आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये दंगल सुरू आहे. हे आम्हाला दिसत आहे. देशात राज्यात दंगल सुरू आहे. त्यासाठीच न्याय यात्रा हे काम करत आहे. महागाई च्या विरोधात ही न्यायात्र काम करत आहे. लोकशाही टिकावी यासाठी ही न्याय यात्रा आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.