AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकल्प पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आमच्याकडं, एकनाथ शिंदे यांचा टोला

ठाण्यात पुलाच्या उद्घाटनानंतर रंगली श्रेयवादाची लढाई सुरू झाली. श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात दुसऱ्यांदा वाकयुध्द रंगले.

प्रकल्प पूर्ण करण्याची इच्छाशक्ती आमच्याकडं, एकनाथ शिंदे यांचा टोला
| Edited By: | Updated on: Nov 13, 2022 | 7:29 PM
Share

ठाणे : सर्वांच्या प्रयत्नातून प्रकल्प पूर्ण होत असतात. महापौर, आमदार, खासदार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. या पुलासाठी ठाणे महापालिकेनं खर्च केला. कोणताही प्रकल्प पूर्ण करण्यासाठी इच्छशक्ती लागते. ती आमच्याकडं आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. ठाण्यात पुलाच्या उद्घाटनांतर ते बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले, तुम्हाला रस भांडणात की विकासात कशात आहे. आजपासून पुलाचे उद्घाटन झाले आहे. त्यामुळे आता वाहातूक कोंडी होणार नाही. एरोली टनेलचे काम जोरात सुरू आहे. त्याचे काम लवकर होईल. ज्यांनी या पुलाला मदत केली त्यांचे आभार मानतो. शिळ फाट्याची वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.

ठाण्यात पुलाच्या उद्घाटनानंतर रंगली श्रेयवादाची लढाई सुरू झाली. श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात दुसऱ्यांदा वाकयुध्द रंगले, पुल आम्ही बनवला म्हणणाऱ्या आव्हाडांना पैसे कोणाच्या सरकारने दिले, असा प्रतिप्रश्न श्रीकांत शिंदे यांनी आव्हाडांना केला. मी आणि शिंदे साहेबांनी एकत्र काम केले. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. तीन महिन्यांपूर्वी मला मनेसेचे नेते म्हणत होते की पुलाचे उद्घाटन करू. मात्र मुख्यमंत्री आल्याशिवाय उद्घाटन होणार नाही मी असं म्हटलं, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड एकाच मंचावर आले. कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या मार्गिकेचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. नवीन पुलाची आवश्यकता होती. त्यामुळं या पुलाचं काम पूर्ण झालं. प्रकल्प हा लोकांच्या फायद्यासाठी झाला पाहिजे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल. एमएमआरडीए आणि स्थानिक महापालिका काम करते. मेट्रोसुद्धा पुढं जात आहे. पब्लिक सेवा चांगली होणं आवश्यक आहे. शहरातली अडचणीची ठिकाण कमी केली पाहिजे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.