AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी सांभाळून बोललं पाहिजे, जितेंद्र आव्हाड असं का म्हणालेत?

मनसेच्या नेत्यांनी मला फोन करून सांगितलेलं. आपण दोघं मिळून उद्घाटन करूया.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी सांभाळून बोललं पाहिजे, जितेंद्र आव्हाड असं का म्हणालेत?
Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 13, 2022 | 8:50 PM
Share

ठाणे : खासदार श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावरून बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, आता मुख्यमंत्री यांचा मुलगा आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी सांभाळून बोललं पाहिजेत. आताचं आम्हाला धमकी मिळाली आहे. किती दिवस जेलमध्ये बसाल तुम्हाला कळणार नाही. आता घाबरलं पाहिजे ना. आताचं धमकी दिली ना आम्हाला सगळ्या मंत्र्यांची चौकशी करू. मग बघू तुम्हाला कोण जामीन देतो. धमक्या मिळणार असतील, तर गाव सोडून गेलेलं बरं, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. नरेश म्हस्के यांनी सर्व मंत्र्यांच्या गैरकारभाराची चौकशी होणार असल्याचं म्हटलं. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रत्युत्तर दिलं.

कळवा पूल दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झालं होतं. पण, मुख्यमंत्र्यांसाठी याचं लोकार्पण झालं नव्हतं. यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, ते ठाण्याचे मुख्यमंत्री होते. पहिल्या वास्तूचं उद्घाटन होतं. आगाऊपणा करून आमच्या कार्यकर्त्यांनी उघडला नसता तर ते चांगलं दिसलं नसतं. शेवटी मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, या मताचा मी होतो. इतर अनेक वेळा पुल उघडलेत, आपल्याला माहिती आहे.

माझीवड्याचा पुल कुणी उघडला. जितेंद्र आव्हाड. माझ्यावर केसेसपणा झाल्यात. हा पुल उघडताना मुख्यमंत्र्यांचा पहिला एवढा मोठा कार्यक्रम होणार आहे. तो त्यांच्या हस्ते व्हावा. एवढी एक माणुसकीची भावना माझ्या मनात होती. म्हणून या पुलाचं उद्घाटन होऊ दिलं नाही, असंही ते म्हणाले.

मनसेच्या नेत्यांनी मला फोन करून सांगितलेलं. आपण दोघं मिळून उद्घाटन करूया. तेव्हा मी त्यांना सांगितलं विचार करून सांगतो. कारण हा पुल माझ्या मतदारसंघात आहे. या पुलाची पहिली मागणी मी केली आहे. मान्यता विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

नंतर प्रोसेस सुरू झाली. पुढं होणाऱ्या टनेलला मंजुरी आमच्या कॅबिनेटमध्ये मी मंत्री असताना मिळाली आहे. कुणीतरी सुरुवात करतो. कुठंतरी शेवट होतो. सुरुवात करणं हे महत्त्वाचं असतं. लोकांच्या हितासाठी काम करणं महत्त्वाचं असतं. मला काही कामाचं क्रेडिट करायचं नसतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...