AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी सांभाळून बोललं पाहिजे, जितेंद्र आव्हाड असं का म्हणालेत?

मनसेच्या नेत्यांनी मला फोन करून सांगितलेलं. आपण दोघं मिळून उद्घाटन करूया.

मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी सांभाळून बोललं पाहिजे, जितेंद्र आव्हाड असं का म्हणालेत?
Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 13, 2022 | 8:50 PM
Share

ठाणे : खासदार श्रीकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यावरून बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, आता मुख्यमंत्री यांचा मुलगा आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी सांभाळून बोललं पाहिजेत. आताचं आम्हाला धमकी मिळाली आहे. किती दिवस जेलमध्ये बसाल तुम्हाला कळणार नाही. आता घाबरलं पाहिजे ना. आताचं धमकी दिली ना आम्हाला सगळ्या मंत्र्यांची चौकशी करू. मग बघू तुम्हाला कोण जामीन देतो. धमक्या मिळणार असतील, तर गाव सोडून गेलेलं बरं, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. नरेश म्हस्के यांनी सर्व मंत्र्यांच्या गैरकारभाराची चौकशी होणार असल्याचं म्हटलं. त्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी हे प्रत्युत्तर दिलं.

कळवा पूल दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झालं होतं. पण, मुख्यमंत्र्यांसाठी याचं लोकार्पण झालं नव्हतं. यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, ते ठाण्याचे मुख्यमंत्री होते. पहिल्या वास्तूचं उद्घाटन होतं. आगाऊपणा करून आमच्या कार्यकर्त्यांनी उघडला नसता तर ते चांगलं दिसलं नसतं. शेवटी मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे, या मताचा मी होतो. इतर अनेक वेळा पुल उघडलेत, आपल्याला माहिती आहे.

माझीवड्याचा पुल कुणी उघडला. जितेंद्र आव्हाड. माझ्यावर केसेसपणा झाल्यात. हा पुल उघडताना मुख्यमंत्र्यांचा पहिला एवढा मोठा कार्यक्रम होणार आहे. तो त्यांच्या हस्ते व्हावा. एवढी एक माणुसकीची भावना माझ्या मनात होती. म्हणून या पुलाचं उद्घाटन होऊ दिलं नाही, असंही ते म्हणाले.

मनसेच्या नेत्यांनी मला फोन करून सांगितलेलं. आपण दोघं मिळून उद्घाटन करूया. तेव्हा मी त्यांना सांगितलं विचार करून सांगतो. कारण हा पुल माझ्या मतदारसंघात आहे. या पुलाची पहिली मागणी मी केली आहे. मान्यता विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

नंतर प्रोसेस सुरू झाली. पुढं होणाऱ्या टनेलला मंजुरी आमच्या कॅबिनेटमध्ये मी मंत्री असताना मिळाली आहे. कुणीतरी सुरुवात करतो. कुठंतरी शेवट होतो. सुरुवात करणं हे महत्त्वाचं असतं. लोकांच्या हितासाठी काम करणं महत्त्वाचं असतं. मला काही कामाचं क्रेडिट करायचं नसतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश