AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लसीकरणाअभावी तिसरी लाट रोखणार कशी? खासदार श्रीकांत शिंदेंचा केंद्राला सवाल

गेल्या काही दिवसांपासून पुरेशा लसी उपलब्ध होत नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून लसीकरण वारंवार बंद ठेवले जात आहे.

लसीकरणाअभावी तिसरी लाट रोखणार कशी? खासदार श्रीकांत शिंदेंचा केंद्राला सवाल
Shrikant Shinde
| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 10:47 PM
Share

ठाणे : गेल्या काही दिवसांपासून पुरेशा लसी उपलब्ध होत नसल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून लसीकरण वारंवार बंद ठेवले जात आहे. लसीकरणासंदर्भात बोलताना कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे म्हणणे आहे की, केंद्राने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आपण कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहोत. परंतु जर लसीकरणच झाले नाही तर तिसऱ्या लाटेला रोखणार कसे? असा सवाल खासदार शिंदे यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक महापालिकेला आणि राज्याला मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करुन दिली पाहिजे, अशीही मागणीदेखील त्यांनी केली आहे. (Without Vaccination How can we stop Third wave of Corona ; Shrikant Shinde raised Question)

मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये, तालुक्यांमध्ये लस उपलब्ध नसल्याने आज आणि उद्या लसीकरण बंद ठेवण्यात आले आहे. एकीकडे केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात लसीकरण राबवा म्हणून राज्यांना आदेश देत आहे. तर दुसरीकडे रुग्णालय तसेच आरोग्य केंद्रांमध्ये लसींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारावर आता टीका होऊ लागली आहे.

मुंबईत आज आणि उद्या लसीकरण बंद

कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज (शनिवार, 10 जुलै) लसीकरण बंद होते. तसेच रविवारी (उद्या) साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी लसीकरण कार्यक्रम नियमित सुट्टी म्हणून बंद राहणार आहे.

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लशींचा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरिक निर्बंधांतून सुटणार?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईत लागू झालेले निर्बंध अद्याप कायम आहेत. कोरोनाची दुसरी लाट (Coroanvirus) नियंत्रणात येऊनही हे निर्बंध शिथील करण्यात आले नव्हते. त्यामुळे आता मुंबईकर हे निर्बंध कधी उठणार, असा सवाल विचारू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या 15 तारखेला यासंदर्भात बैठक होणार आहे. तेव्हा मुंबईकरांना निर्बंधामधून सूट देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

त्यामुळे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना निर्बंधांतून सूट मिळू शकते. अशा नागरिकांना कार्यालये व इतर ठिकाणी प्रवेशासाठी सवलत देण्याचा विचार सुरु आहे. मुंबईतील कोरोना परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. मात्र, तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे राज्य सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नाही. त्यामुळे लोकल ट्रेन आणि इतर सेवांवर निर्बंध आहेत. मात्र, दीर्घकाळ निर्बंध लागू असल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारकडून निर्बंध काहीप्रमाणात शिथील करून नागरिकांना दिलासा दिला जाऊ शकतो.

आतापर्यंत 12 लाख मुंबईकरांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर 46,81,780 जणांना कोरोना लसीचा एकच डोस मिळाला आहे. एकूण 59 लाख 29 हजार नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.

संबंधित बातम्या:

ब्रिटनने मास्कसह सगळे निर्बंध हटवले, राऊत म्हणाले, ‘त्यांचा निर्णय आत्मघातकी आणि जगासाठी धोकादायक’

कोरोनाच्या लस संपल्या, मुंबईत शनिवारी, रविवारी शासकीय, महापालिका केंद्रांवर लसीकरण बंद

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पुन्हा वाढ, अ‍ॅक्टिव्ह केसेसही वाढल्या

(Without Vaccination How can we stop Third wave of Corona ; Shrikant Shinde raised Question)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.