AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल केला; ऋषिराज सावंत प्रकरणात मोठं ट्विस्ट, महत्त्वाची माहिती समोर

आपला मुलगा ऋषीराज सावंत हा बेपत्ता नाहीये, तो मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता.  माझा मुलगा कुठल्याही अनोळखी मुलांसोबत नाही तर तो त्याच्या मित्रांसोबत आहे. अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली.

...म्हणून अपहरणाचा गुन्हा दाखल केला; ऋषिराज सावंत प्रकरणात मोठं ट्विस्ट, महत्त्वाची माहिती समोर
| Updated on: Feb 11, 2025 | 7:09 PM
Share

सोमवारी माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची बातमी समोर आली होती. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचं पुणे विमानतळावरून अपहरण झाल्याच्या बातमीनं एकच खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी देखील तपासाला सुरुवात केली. मात्र त्यानंतर तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालं नसून ते  मित्रांसोबत बँकॉक निघाले होते अशी माहिती समोर आली, याबद्दल खुद्द तानाजी सावंत यांनीच माहिती दिली.

नेमकं काय म्हणाले तानाजी सावंत?  

आपला मुलगा ऋषीराज सावंत हा बेपत्ता नाहीये, तो मित्रांसोबत बँकॉकला निघाला होता.  माझा मुलगा कुठल्याही अनोळखी मुलांसोबत नाही तर तो त्याच्या मित्रांसोबत आहे. तो बेपत्ता झाला किंवा त्याचे अपहरण झाले असा कुठलाही प्रकार नाही. मात्र तो नेहमी घरातून बाहेर पडताना सागूंन जातो. मात्र यावेळी तसं काही झालं नाही, म्हणून आम्हाला चिंता वाटली, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट आलं आहे.

या प्रकरणात सिहंगड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ऋषिराज सावंत यांच्या बँकॉक जाण्याला त्यांचे वडील तानाजी सावंत आणि पत्नी यांचा विरोध होता. त्यामुळे मुख्यमंत्री आणि केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क करून बँकॉकला निघालेले विमान हवेतून फिरवून पुन्हा थेट पुण्यात आणले गेले. ऋषिराज यांनी बँकॉकला जाण्यासाठी तब्बल 68 लाख रुपये मोजले होते. हवेतील विमान पुन्हा माघारी बोलवण्यासाठी काहीतरी ठोस कारण हवं होतं त्यासाठी सिहंगड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती या प्रकरणात समोर आली आहे. ऋषिराज सावंत यांच्यासह त्यांचे मित्र संदीप वसेकर आणि प्रवीण उपाध्ये हे बँकॉकला निघाले होते.

दरम्यान या प्रकरणात सोमवारी रात्री पोलिसांकडून ऋषिराज सावंत यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. यावेळी माहिती देताना त्यांनी म्हटलं की, मी व्यावसायिक कारणासाठी बँकॉककला निघालो होते, माझं अपहरण झालं नसल्याचं ऋषिराज यांनी म्हटलं.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.