AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका, उमेदवारच नाही, निवडणूक होणार कशी? निवडणूक आयोगासमोर पेच

राज्यातील 2359 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ही निवडणूक होत आहे. तर, सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अजे मागे घेण्याची मुदत होती.

आरक्षणाच्या आंदोलनाचा फटका, उमेदवारच नाही, निवडणूक होणार कशी? निवडणूक आयोगासमोर पेच
MARATHA RESERVATION ANDOLAN Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Oct 25, 2023 | 8:47 PM
Share

मुंबई | 25 ऑक्टोंबर 2023 : मराठा आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. जरांगे पाटील यांनी नेते, मंत्री, आमदार यांना गावबंदी करा असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अनेक गावांनी नेते, मंत्री आमदार यांना गावबंदी केलीय. मराठा आरक्षणाचे हे लोन राज्यात पसरले आहे. जालन्यातील अंबडचे रहिवाशी असलेल्या सुनील कावळे यांनी सहा दिवसांपूर्वी आपले जीवन संपवले. त्यांनी ‘आधी मराठा आरक्षण मग इलेक्शन’ अशी चिट्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे मराठा समाज अधिक संतापला आहे. अनेकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. पण, याचा मोठा फटका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकीला बसलाय.

राज्यातील 2359 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ही निवडणूक होत आहे. तर, सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा अखेरचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अजे मागे घेण्याची मुदत होती. मात्र, मराठा समाजाच्या आंदोलनामुळे निवडणुकीत अर्ज दाखल करूनही अखेरच्या दिवशी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंढरपुरमधील चाळीस दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होताच वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले. राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, काँग्रेस या पक्षाचे शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांनी राजीनामे देत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप मांडवे, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष कवडे, शिवसेना शिंदे गट शराध्यक्ष सुमित शिंदे, भाजपाचे सचिव नितिन करांडे, कॉंग्रेस शहराध्यक्ष हणुमंत मोरे यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिलेत.

धाराशिव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

मराठा आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत गावात निवडणुका घेऊ नका अशी मागणी धाराशिव तालुक्यातील जागजी गावातील गावकऱ्यांनी केली. त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत भाजप आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी भरलेले आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. पंचायतमधील सहा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीवर ग्रामस्थांनी एकत्रित येत बहिष्कार टाकला.

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील वझुर येथील ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली. एक सरपंच आणि 11 ग्राम पंचायत सदस्य अशा 12 जागांसाठी ही निवडणूक होणार होती. या निवडणुकीत सरपंच पदासाठी 3 तर ग्रामपंचायत सदस्यासाठी 31 अर्ज असे एकूण 34 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर करत येथील सर्वच्या सर्व म्हणजे 34 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. पालम तालुक्यातील चाटोरी ग्रामपंचायतमधील एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार होती. तिथेही चार चार जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, या चारही जणांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेत मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला पाठींबा दिला.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर उईके संतापले
साप चावल्याने विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आश्रमशाळा व्यवस्थापनावर मंत्री उईके संतापले
मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ
Tardeo Estate Agent | मांसाहार करत असाल तर... भावेश कावरे यांच्या व्हिडिओने मुंबईत खळबळ, नेमकं प्रकरण काय?
'बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले'
बावनकुळेंना चांगलं म्हणायचो, पण आता ते मनातून उतरले - जरांगे पाटलांचे खळबळजनक विधान.
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; नेमकं काय घडलं?
पतीला गमावलं, महिनाभरात पत्नीनेही आयुष्य संपवलं; दोन मुलींवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं, नेमकं काय घडलं?
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार