AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खारघरच्या ‘त्या’ दुर्दैवी दुर्घटना प्रकरणी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, मृत अनुयायांचा शव विच्छेदन अहवालही समोर आला आहे.

खारघरच्या 'त्या' दुर्दैवी दुर्घटना प्रकरणी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
MAHARASHTRA BHUSHANImage Credit source: TV9 NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Apr 20, 2023 | 6:57 PM
Share

मुंबई : नवी मुंबई येथील खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यानंतर झालेल्या दुर्दैवी घटनेसंदर्भात राज्य सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला. या पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमादरम्यान 14 निष्पाप अनुयायांचा उष्माघाताने मृत्यू झाला. तर, अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यावरून विरोधकांनी राज्यसरकारवर टीका केली आहे. खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर, मृत अनुयायांचा शव विच्छेदन अहवालही समोर आला आहे.

विरोधकांनी राज्य सरकारवर आरोप करताना ही घटना नैसर्गिक नाही तर शासननिर्मित आहे. ही दुर्दैवी घटना सदोष नियोजनामुळे घडली असा आरोप केला. या घटनेला पूर्णतः राज्य सरकार जबाबदार आहे. त्यामुळे या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा मुख्यमंत्री यांच्यावर दाखल करावा अशी मागणीही होत आहे.

दुसरीकडे खारघर येथील श्री सेवकांच्या मृत्यूच्या शव विच्छेदन अहवालात मृतांपैकी 12 जणांनी मृत्यूपूर्वी 6 ते 7 तास काहीही खाल्ले नव्हते. मृत्युमुखी पडलेल्या काही जणांना हायपर टेन्शन, डायबिटीस, हृदयरोग अशा व्याधी होत्या. वेळेवर अन्न, पाणी मिळणे नाही त्यातच ऊन जास्त झाल्याने 14 जणांचा मृत्यू झाला. उन्हात बसलेल्यांना पाण्यासह सावलीचीही गरज होती. कार्यक्रमात असलेले पाणी लोकांपर्यंत पोहचले नाही त्याचा मोठा फटका बसला अशी कारणे समोर आली आहेत.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांची ही एक सदस्यीय समिती आहे.

एका महिन्याच्या मुदतीत नितीन करीर यांना अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. भविष्यातील अशा प्रकारच्या शासकीय समारंभाच्या आयोजनाबाबत कोणत्या गोष्टींची काळजी आणि दक्षता घ्यावी, याबाबतही करीर समिती शासनास शिफारस करणार आहे.

Follow Us
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण