वीज, पाणी, घर नाही, सहा महिने उलटूनही तिवरे धरणग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन नाही

काही महिन्यांपूर्वीच चिपळून येथे तिवरे धरण फुटलं होते. त्यामुळे संपूर्ण गावा पाण्याखाली गेले होते. काही क्षणात अनेकांच्या संसाराची राख (Tivre Dam rehabilitation)  रांगोळी झाली.

वीज, पाणी, घर नाही, सहा महिने उलटूनही तिवरे धरणग्रस्तांचे कायमस्वरुपी पुनर्वसन नाही
Follow us
| Updated on: Jan 13, 2020 | 3:58 PM

रत्नागिरी : काही महिन्यांपूर्वीच चिपळून येथे तिवरे धरण फुटलं होते. त्यामुळे संपूर्ण गावा पाण्याखाली गेले होते. काही क्षणात अनेकांच्या संसाराची राख (Tivre Dam rehabilitation)  रांगोळी झाली. यामध्ये अनेकांची घरं वाहून गेली होती. त्यासोबतच अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले होते. या घटनेला आज सहा महिने उलटूनही अद्याप सरकारकडून प्रकल्पग्रस्तांना हक्काचे घर मिळालेलं (Tivre Dam rehabilitation) नाही.

तिवरे धरणात ज्यांची घरं वाहून गेली आहेत त्यांना सरकारने तात्पुरते राहण्यासाठी कंटेनरची व्यवस्था करुन दिली आहे. पण या कंटेनरमध्येही वीज, पाण्यीची पुरेशी सोय नाही. त्याोसबतच ते मदतीसाठी आपलं धान्यही पुरवून खात आहेत.

या घटनेत एक 70 वर्षीय आजीनेही आपल्या व्यथा मांडल्या आहेत. या घटनेपूर्वीच आजीची मुलं देवाघरी गेली होती. सध्या त्या एकट्या राहत आहेत. आजींचेही पुनर्वसन झाले. पण व्यवस्थित चालता न येणाऱ्या आजीला अगदी टोकाला कंटेनर दिला आहे. ज्यामुळे त्यांना येजा करण्यास त्रास होत आहे. त्याोसबतच कंटेनरमध्ये दिलेला टेकू सुद्ध अगदी तकलादू आहे. त्यामुळे इथे राहण्यासाठी भीती वाटते, अशी खंत आजींनी व्यक्त केली.

राधिका आजीप्रमाणे या गावातील हिराबाई कनावजे यांचीही परिस्थिती वाईट आहे. कुटुंबात दहा लोकं पण राहायला एकच कंटेनर दिला आहे. तिवरे धरणात कनावजे यांचे घर सुद्धा वाहून गेले होते. तिवरे धरण फुटीत रेशन कार्डही वाहून गेले. त्यामुळे रेशन दुकानावर मिळणारे धान्य बंद झाले. आता जगायचे कसे असा प्रश्न हिराबाईसमोर उभा आहे.

“तिवरे धरण फुटीनंतर आज पाच कुटुंबीय कंटेनरमध्ये राहत आहेत. पुर्नवसन फक्त नावापुरतेच आहे”, असा आरोप इथल्या स्थानिकांनी केला आहे.

तिवरे धरणग्रस्तांच्या व्यथा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी समाजून घेतल्या असून लवकरच यावर सर्व प्राथमिक सुविधा तात्काळ पुरवण्याचे आश्वासन त्यांनी दिलं.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.