AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra corona, omicron Update : मुंबईला मोठा दिलासा, महाराष्ट्र अजूनही 40 हजार पार, वाचा ताजी आकडेवारी

कालच्या तुलनेत आजची राज्यातली कोरोना रुग्णांची आकडेवारी किंचीत घटली असली तरी आजही राज्यात 41 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Maharashtra corona, omicron Update : मुंबईला मोठा दिलासा, महाराष्ट्र अजूनही 40 हजार पार, वाचा ताजी आकडेवारी
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 8:28 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातला कोरोना रुग्णांचा आकडा (Maharashtra corona update) सतत 40 हजारांच्या पुढे आहे. कालच्या तुलनेत आजची राज्यातली कोरोना रुग्णांची आकडेवारी किंचीत घटली असली तरी आजही राज्यात 41 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चोवीस तासात राज्यात 41 हजार 327 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 40 हजार 386 कोरोना रुग्ण बरे झाल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात आज 29 कोरोना रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. ओमिक्रॉनची आकडेवारी चांगलीच घटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या चोवीस तासात राज्यात 8 नवे ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. तर एकूण ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा 1 हजार 738 वर पोहोचला आहे. त्यातले 932 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.

मुंबईला मोठा दिलासा

गेल्या काही दिवसांपूर्वी एकट्या मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी वीस हजारांच्या पुढे पोहोचली होती, मात्र आता ती गेल्या काही मागील काही दिवसात सातत्याने घटताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला आहे. 20 हजारावरून कोरोना रुग्णांचा आकडा घसरून 7 हजारांवर आला आहे. मुंबईत गेल्या चोवीस तासात 7 हजार 895 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत आज 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. आज 21 हजार 25 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत, त्यामुळे मुंबईला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे मुंबई पॅटर्नची जगभर चर्चा झाली होती, येत्या काही दिवसातही मुंबईकरांनी नियमांचे पालन केल्यास लवकरच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतही मुंबई पॅटर्न प्रभावी ठरल्याचे दिसून येईल.

इतर जिल्ह्यातली रुग्णवाढ कायम

मुंबईतली रुग्णसंख्या जरी झपाट्याने घटत असली तरी इतर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. विषेशत पुण्यातल्या रुग्णसंख्येना आता चिंता वाढवली आहे. राज्यात ऑक्सिजनची गरज 700 मेट्रीक टनच्या पुढे गेल्यास मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा कालच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे. त्यामुळे कोरोना नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यंत गरजेचे आहे.

Punjab | काँग्रेसला पंजाबमध्ये मोठा धक्का! हरजोत कमलनंतर काँग्रेसचे आणखी 5 ज्येष्ठ नेते भाजपात दाखल

ओबीसी विषयावर सरकार फक्त खोटं बोलतं, चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Video | Solapur Accident | काम आटोपून घरी निघाले होते, पण वाटेतच काळानं गाठलं, तिघांचा दुर्दैवी अंत

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.