AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साष्टांग दंडवत घालतो, नतमस्तक होतो, उठाबश्या घालतो, माफी मागतो, पण… उद्धव ठाकरे असं का म्हणाले?

आज शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभरात आंदोलनाची हाक देण्यात आली होती, या आंदोलनानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या खास ठाकरे शैलीमध्ये सरकारचा समाचार घेतला आहे.

साष्टांग दंडवत घालतो, नतमस्तक होतो, उठाबश्या घालतो, माफी मागतो, पण... उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
| Updated on: Aug 11, 2025 | 5:15 PM
Share

महायुतीमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा या मागणीसाठी आज शिवसेना ठाकरे गट रस्त्यावर उतरल्यचं पाहायला मिळालं. भ्रष्टाचाराविरोधात आज शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभरात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. दरम्यान या आंदोलनानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी आपल्या खास ठाकरे शैलीमध्ये सरकारचा समाचार घेतला, त्यांनी निवडणूक आयोगावर देखील जोरदार निशाणा साधला आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले, तुम्ही याविरोधात कोर्टात जाणार का? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना ठाकरे यांनी खोचक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले ठाकरे?

कोर्टात जायला हरकत नाही. पहिला आमचाच निकाल लागला नाही. तारीख पे तारीख सुरू आहे. तीन वर्ष झाली. काय त्याला कालमर्यादा आहे की नाही. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना बंधन टाकलं आहे, तीन महिन्याच्या आत निकाल लागला पाहिजे. तसं मी सर्वोच्च न्यायालयाला हातजोडून, नतमस्तक होऊन, साष्टांग दंडवत घालून विनंती करतो की कृपा करून आपल्या समोर लोकशाहीची जी केस सुरू आहे, तिचीही एक कालमर्यादा ठरवून निकाल द्या. नाही तर आता हे चौथे सरन्यायाधीश झाले. किती सरन्यायाधीश झाले पाहिजे? किती दिवसात तो निकाल लागला पाहिजे. असं पुन्हा साष्टांग दंडवत घालून, त्यांची माफी मागून, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन, त्यांच्यासमोर उठाबश्या घालून मी त्यांना विनंती करतो, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर देखील जोरदार निशाणा साधला.  जी मतं आपल्या विरोधात आहे त्याची छाटणी करायची आणि मतांची चोरी करून आपली मते वाढवायची. हा लोकशाहीवरचा दरोडा आहे. निवडणूक आयोग एक एक निर्णय आपल्या मर्जीने घेत आहे. निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींपेक्षा मोठे झाले का? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.