AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना ही भाषा शोभत नाही, रवी राणा यांनी सुनावलं

यातील राज उघडल्यानंतर मोठा भूकंप महाराष्ट्रात होईल. तेव्हा उद्धव ठाकरे हे अडचणीत येतील, असा इशारा रवी राणा यांनी दिला.

उद्धव ठाकरे यांना ही भाषा शोभत नाही, रवी राणा यांनी सुनावलं
रवी राणा
| Edited By: | Updated on: Dec 26, 2022 | 8:46 PM
Share

नागपूर : उद्धव ठाकरे किती वेळा बेळगावला गेले मला माहीत नाही. आदित्य ठाकरे यांच्या संरक्षणासाठी ते विदर्भात आले. विदर्भ संकटात होता तेव्हा कुणासाठी ते विदर्भात आले नाहीत, असा आरोप रवी राणा यांनी केला. बेळगावचा मराठी माणूस असो की, राज्यातला प्रत्येकाचं संरक्षण करण्यासाठी न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. केंद्र सरकारचं दोन्ही राज्यांकडं लक्ष आहे. केंद्राचे गृहमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत. बेळगावातील कुणावरही अन्याय होणार नाही. बेळगावला केंद्रशासित प्रदेश करावं, अशी भाषा उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र केंद्रशासित प्रदेश करावा, अशा परिस्थितीत आला होता, असं रवी राणा यांनी सुनावलं.

रवी राणा म्हणाले, सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन हत्या प्रकरणात रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी दावा केलाय की, राजपुतची आत्महत्या नसून हत्या आहे. त्यांच्या मानेवरती व्रण पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेकदा तो विषय नितेश राणे आणि नारायण राणे यांनी उचलला होता.

सुशांतचा पीएम रात्री झालाय. सुशांतचा पीएम रात्री करणं, व्हिडिओग्राफी न करणं फक्त फोटोग्राफी करणं. मुख्यमंत्री ठाकरे असल्यामुळं त्यावेळी या गोष्टीमधील राज अजून बाहेर आला नाही. यातील राज उघडल्यानंतर मोठा भूकंप महाराष्ट्रात होईल. तेव्हा उद्धव ठाकरे हे अडचणीत येतील, असा इशारा रवी राणा यांनी दिला.

कोल्हे प्रकरणात गुप्त विभागाकडं चौकशी लावण्यात आली आहे. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पोलीस अधिकारी आरती सिंग यांना फोन करून हत्याकांड दाबण्याचा प्रयत्न केला. त्यासंबंधीचे पुरावे गुप्त विभागाकडं देणार असल्याचं रवी राणा म्हणाले.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...