AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिहार विधानसभा निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, कळायला मार्ग नाही, ज्याच्या…

बिहार विधानसभा 2025 चा निकाल लागला असून भाजपा सर्वात मोठा पक्ष बिहारमधील ठरला. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून कॉंग्रेससह आरजेडीचा धुव्वा उडाला. आता पहिल्यांदाच बिहार निकालावर बोलताना उद्धव ठाकरे दिसले आहेत.

बिहार विधानसभा निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, कळायला मार्ग नाही, ज्याच्या...
Uddhav Thackeray
| Updated on: Nov 16, 2025 | 2:27 PM
Share

आमदार चषकाच्या टी-शर्ट आणि लोगोचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण करण्यात आलंय. यावेळी उद्धव ठाकरे भाजपावर जोरदार टीका करताना दिसले. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे हे मराठवाडा दाैऱ्यावर होते. यावेळी कर्जमुक्ती शेतकऱ्यांची झालीच पाहिजे म्हणताना उद्धव ठाकरे दिसले. यावेळी ते थेट बांधावर पोहोचले होते आणि गावागावात सभा घेत शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना दिसले. बिहारमध्ये एनडीए स्वबळावर आली असून भाजपा बिहारमधील सर्वात मोठा पक्ष ठरला. कॉंग्रेस आणि आरजेडीचा धुव्वा उडाला. एझिक्ट पोलपेक्षाही वेगळा निकाल बिहारमधून आला. आता बिहारमध्ये मुख्यमंत्री नेमका कोणाचा होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

बिहारच्या विजयाबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, बिहारचाही संघ खेळायला येणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, जो जिता वही सिकंदर. पण सिकंदर बनण्याचं राज कोणी समजू शकले नाही. जे जिंकले त्यांचं अभिनंदन. निवडणुकीत तेजस्वीलाच्या प्रचार सभेला मोठी गर्दी होती. ती खरी होती की एआयची होती हे कळायला मार्ग नाही. ज्याच्या सभेला अलोट गर्दी असते त्याचं सरकार येत नाही.

पण ज्यांच्या सभेत खुर्च्या खाली होत्या त्यांचं सरकार येतं, हे कळण्याच्या पलिकडचे आहे. 10 हजार दिले हा एक फॅक्टर आहे. त्याने काही फरक पडला आहे. पण रोज लोक जे भोगत आहेत. त्यांच्या मनातून अजून जात नाही. हरकत नाही जो जिता वही सिकंदर आहे. बहूमत आल्यावरही त्यांना नेता निवडता येत नाही. महाराष्ट्रातही पाशवी मतदानानंतर नेता निवडायला त्यांनी काही वेळ घेतला.

अनाकलनीय गणित आहे. त्यावेळी मुद्दा उचलला होता. मतदार यादीतून 65 लाख नावं वगळली. ती परत घेतली की नाही माहीत नाही. आम्ही मोर्चा काढला. दुबार नोंदणी, बोगस पत्त्यावर आम्ही बोललो. पण निवडणूक आयोग काही बोलत नाही. ढिम्म आहे. त्यामुळे या प्रक्रियेला लोकशाही मानायची का. आमचा निवडणुकीला विरोध नाही. निवडणूक लोकशाहीचा जीव आहे. पण असा प्रकार मानायचा का?  निवडणूक आयोग काही उत्तर द्यायला तयार नाही, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.