AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांना फक्त खोके मिळाले, अख्खी शिवसेना घेऊन गेलो असतो तर गोदाम कमी पडली असती; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांची तोफ आज कोल्हापुरातील राधानगरीत धडाडली. यावेळी त्यांनी गद्दारांचा ठाकरी शैलीत समाचार घेतला. राज्यातील सर्व समाजात अस्वस्थता आहे. अदानीला इथलं पाणी विकलं जातंय अशी टीका यावेळी ठाकरे यांनी केली.

त्यांना फक्त खोके मिळाले, अख्खी शिवसेना घेऊन गेलो असतो तर गोदाम कमी पडली असती; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
| Updated on: Nov 05, 2024 | 2:23 PM
Share

महाराष्ट्रातील विधानसभा लढतीचं चित्र अखेर स्पष्ट झालेले आहे. काल अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता.आज पासून प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरातून अंबाबाईचे दर्शन घेत आपल्या प्रचाराला सुरुवात केली. कोल्हापूरातील राधानगरीत झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी खोके सरकारवर तोफ डागली आहे.उद्धव ठाकरे म्हणाले की आताची लढाई महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही यांच्यासोबतची आहे. महाराष्ट्र प्रेमी आघाडी सोबत आहे. मी लढायला मैदानात उतरलो आहे. साथ देणार आहात? लढणार आहात? विजय देणार आहात? (लोकांचा आवाज हो) मग भाषण करण्याची गरज काय अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी शाब्दीक कोटी केली आहे.

इथल्या विजयाची जबाबदारी सतेज यांच्यावर टाकतो

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की कोल्हापुरातून चांगली सुरुवात झाली. कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतलं. बाळू मामांचे आशीर्वाद घेतले. आता तुमचं दर्शन घेऊन पुढे जाणार आहे. तुमचा उत्साह पाहिल्यानंतर हा राधानगरी मतदारसंघ गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही यात शंका नाही.मधल्या काळात ग्रहण लागलं. मी तुमची हात जोडून माफी मागतो. ती चूक माझ्याकडून झाली. पण तुम्ही मोठ्या मनाचे. तुम्ही सर्व केलं. आमदार तुम्ही केलं. मी उमेदवारी दिली. तुमच्या पाठीत वार करायला काही लोक उभे आहेत. आणखी काय द्यायचं होतं. आमदार केलं. मान सन्मान प्रेम दिलं सर्व दिल्यानंतर शिवसेना नावाच्या आईवर वार करणारा माणूस तुमचा होऊ शकतो का. एका गोष्टीचं बरं वाटलं. सतेज सोबत आहेत असेही उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की सतेज तुमचं नाव घेतल्यावर उत्साह पाहिला. एक गोष्ट चांगली झाली का म्हटलं कारण इथल्या विजयाची जबाबदारी मी सतेजवरच टाकतोय. शाहू महाराज सोबत आहेत. त्यांचे आशीर्वाद आहेत. हा जोश पाहिजे. शिवरायांचा महाराष्ट्र हा जोशपूर्णच पाहिजे असेही उध्दव ठाकरे यावेळी सांगितले.

न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली, पण

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की तुमच्या मनात जो राग आहे. तो राग अडीच वर्ष आपण आपल्या हृदयात धगधगत ठेवला. कधी वेळ येते आणि खोके सरकारला भस्म करतोय ही वाट महाराष्ट्र पाहत होता. तो क्षण आला आहे. आपल्याला न्यायदेवतेकडून न्याय आला नाही. न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली. पण देशातील लोकशाही मरत आहे हे दिसत नाही. म्हणून मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो आहे. त्यांना ५० खोके दिले. मी अख्खी शिवसेना घेऊ गेलो असतो तर काय झालं असतं. त्यांचं गोदाम रिकामं पडलं असतं. पण ही गद्दारी माझ्या रक्तात नाही. हा हरामखोरपणा रक्तात नाही. मी माझ्या महाराष्ट्राला गुलाम बनवून विकला जाणाऱ्यातील नाही. त्या औलादीचा नाही. मला आश्चर्याचा धक्का बसला केपी पाटील सांगत होते इथलं पाणी अदानीला विकलं जातं. मला वाटलं मुंबईच विकली की काय. संपूर्ण महाराष्ट्र अदानीला फुकट दिला जातो. आम्ही काय षंड म्हणून बघत बसणार. नामर्द म्हणून पाहत बसणार. मी आज बाळू मामांचे आशीर्वाद घेतले. त्यांना हातजोडून तीच विनंती केली. तुमचा धनगर समाज तडफडतोय, अस्वस्थ होतोय. त्याच्याकडे कोणी पाहत नाही. सर्वसमाज तोडूनफोडून टाकले आहेत असेही ठाकरे यावेळी बरसले.

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू.
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?.
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.