AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करतील, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

राहुल गांधी यांनी कितीही यात्रा केल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.

मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करतील, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 02, 2022 | 2:44 PM
Share

नवी दिल्ली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातले प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातच परत गेले. आरटीआयमधून माहिती समोर आलीय. अठरा महिने मुख्यमंत्री राज्यात नसताना काय प्रकल्प येणार, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. आत्ताचे मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री 18-18 तास काम करत आहेत. कुठंला उद्योगपती पैसे गुंतवणार. उद्योग आणण्यासाठी इच्छाशक्ती लागते. उपलब्धता पाहिजे.महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना इच्छाशक्ती नव्हती. महाविकासआघाडी नेत्यांनी भांडाफोड करण्यापेक्षा आता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात भाजप उत्तर देईल. खोटे बोलाल तर उत्तर देईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

राहुल गांधी यांनी कितीही यात्रा केल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आमचे दोन्ही नेते बुलेट ट्रेनसारखे काम करतायेत. विरोधकांना शेवटची घरघर लागली आहे. मताच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करायला तयार आहेत, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

आदित्य यांनी वेदांतासाठी पुण्यात आंदोलन केलं होतं. जागा दिल्याचं ते सांगत होते. पण, जागा दिल्याच गेली नव्हती. लोकांचे काम करायची सवय नव्हती. यामुळं प्रकल्प परत गेले. यानंतर चुकीच्या पद्धतीनं गैरसमज पसरविला तर भाजप तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात उत्तर देईल.

नितीन गडकरी, पियूष गोयल, नारायण राणे व इतर सर्व केंद्रीय मंत्री दोन-दोन लोकसभा क्षेत्रांत महिन्यातून एकदा जाणार आहेत. काँग्रेसला आता शेवटची घरघर लागली आहेत. त्यामुळं धावपळ करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अडीच वर्षांपूर्वी एकत्र आलेत. मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करतील. असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....