मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करतील, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
राहुल गांधी यांनी कितीही यात्रा केल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.

नवी दिल्ली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातले प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातच परत गेले. आरटीआयमधून माहिती समोर आलीय. अठरा महिने मुख्यमंत्री राज्यात नसताना काय प्रकल्प येणार, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. आत्ताचे मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री 18-18 तास काम करत आहेत. कुठंला उद्योगपती पैसे गुंतवणार. उद्योग आणण्यासाठी इच्छाशक्ती लागते. उपलब्धता पाहिजे.महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना इच्छाशक्ती नव्हती. महाविकासआघाडी नेत्यांनी भांडाफोड करण्यापेक्षा आता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात भाजप उत्तर देईल. खोटे बोलाल तर उत्तर देईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
राहुल गांधी यांनी कितीही यात्रा केल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आमचे दोन्ही नेते बुलेट ट्रेनसारखे काम करतायेत. विरोधकांना शेवटची घरघर लागली आहे. मताच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करायला तयार आहेत, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
आदित्य यांनी वेदांतासाठी पुण्यात आंदोलन केलं होतं. जागा दिल्याचं ते सांगत होते. पण, जागा दिल्याच गेली नव्हती. लोकांचे काम करायची सवय नव्हती. यामुळं प्रकल्प परत गेले. यानंतर चुकीच्या पद्धतीनं गैरसमज पसरविला तर भाजप तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात उत्तर देईल.
नितीन गडकरी, पियूष गोयल, नारायण राणे व इतर सर्व केंद्रीय मंत्री दोन-दोन लोकसभा क्षेत्रांत महिन्यातून एकदा जाणार आहेत. काँग्रेसला आता शेवटची घरघर लागली आहेत. त्यामुळं धावपळ करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अडीच वर्षांपूर्वी एकत्र आलेत. मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करतील. असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
