AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात अवकाळी, शेतकरी संकटात, अचानक आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान

unseasonal rain | राज्यातील काही भागांत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. ऐन थंडीत पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांना स्वेटर सोडून छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नात पाऊस पडला.

राज्यात अवकाळी, शेतकरी संकटात, अचानक आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान
| Updated on: Jan 06, 2024 | 11:56 AM
Share

पुणे, दि. 6 जानेवारी 2024 | राज्यातील अनेक भागांत पुन्हा अवकाळ पाऊस झाला आहे. हवामान विभागाने राज्यांत शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात आलेल्या या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस झाला. शेत आणि शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनाही या पावसाचा फटका बसला. त्यांच्या मुलाचे शुक्रवारी लग्न होते. त्यावेळी छत्रपती संभाजीनगरात पाऊस झाला.

बुलढाणा जिल्ह्यात पाऊस

बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यांत शुक्रवारी आणि शनिवारी अवकाळी पाऊस पडत आहे. मोताळा तालुक्यांमध्ये पाऊस झाल्यावर आता खामगाव तालुक्यात सुद्धा विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, तूर, हरभरा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात सुद्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका बसला होता. आता पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

जळगाव, नगर जिल्ह्यात पाऊस

अहमदनगरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण आहे. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी पाऊस सुरू झाला. ऐन थंडीत पाऊस सुरू झाल्यामुळे नागरिकांना स्वेटर सोडून छत्र्या बाहेर काढाव्या लागल्या. या पावसाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे. नागरिकांच्या आरोग्यसह पावसामुळे हरभरा, ज्वारी आणि गहू पिकांवरही होणार आहे. जळगाव जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या व काढणीला आलेला तूर पिकाला फटका बसला आहे. मुक्ताईनगर बोदवड तालुक्यात अवकाळी पावसामुळे रब्बीतील गहू, हरभरा, मका तसेच शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेली तूर पीक खराब झाले. शेतकरी तिसऱ्यांदा अवकाळी पावसामुळे संकटात सापडला आहे.

अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नात पाऊस

संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांच्या मुलाच्या लग्नात पाऊस पडला. यामुळे वधूवरा सोबत वऱ्हाडी मंडळीही पावसामध्ये भिजली. दानवे यांच्या मुलाच्या लग्नाला राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. त्या सर्वांना पावसाचा फटका बसला.

पालघरमध्ये पावसाची शक्यता

पालघर जिल्ह्यात 8 जानेवारीला एक दोन ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. नैऋत्य अरबी समुद्रात सक्रिय चक्रवाताच्या स्थितीमुळे पालघर जिल्ह्यात 8 जानेवारी रोजी एक दोन ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. राज्यात पुढील पाच दिवस वातावरण अंशत ढगाळ राहण्याची शक्यताही वर्तविली आहे. पावसाळी वातावरण निर्माण झाल्याने पुढील पाच दिवस कमाल व किमान तापमानात चढ उतार दिसून येईल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.