AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Valmik Karad Surrender: वाल्मिकी कराड याचा शरण येण्याचा टाइमिंगवर काँग्रेसचा प्रश्न? तर रोहित पवार म्हणाले…

Valmik Karad Surrender: खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २२ दिवस पोलिस किंवा सीआयडी वाल्मिक कराडला पकडू शकले नाही. तो स्वतःच्या गाडीतून पोलिसांना शरण आला. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही, असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे.

Valmik Karad Surrender: वाल्मिकी कराड याचा शरण येण्याचा टाइमिंगवर काँग्रेसचा प्रश्न? तर रोहित पवार म्हणाले...
वाल्मिक कराड
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 31, 2024 | 2:20 PM
Share

Valmik Karad Surrender: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मास्टर माईंड संशय असलेला वाल्मिक कराड अखेर २२ दिवसांनी पोलिसांना शरण आला. त्यानंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी वाल्मिकी कराड याला शरण येण्यासाठी २२ दिवस लागले, त्या दरम्यान त्याने काय केले? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या २२ दिवसांत वाल्मिकी कराड याने सर्व पुरावे रद्द केले, असा दावा विजय वड्डेटीवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी जनतेच्या उठावामुळे वाल्मिकी कराड शरण आल्याचे म्हटले.

विजय वड़्डेटीवार काय म्हणाले?

सोशल मीडिया एक्सवर काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २२ दिवस पोलिस किंवा सीआयडी वाल्मिक कराडला पकडू शकले नाही. तो स्वतःच्या गाडीतून पोलिसांना शरण आला. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही. इतके दिवस वाल्मिक कराड याला लपायला कोणी मदत केली? तो कोणाच्या संपर्कात होता? कोणाच्या सांगण्यावरून तो आता पोलिसांना शरण आला? हे सर्व बाहेर आले पाहिजे.

महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष बघता अखेर त्या मंत्र्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी वाल्मिकी कराड याला शरण येण्याचे आदेश दिले आहेत का? असा प्रश्न विजय वड्डेटीवार यांनी उपस्थित केला. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, या वाल्मिक कराडची हिंमत तर इतकी की शरण होण्याआधी हा व्हिडिओ रिलीज करतो आणि स्वतःला क्लिनचीट देतो, यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे.

रोहित पवार म्हणतात…

रोहित पवार यांनी वाल्मिकी कराड याचे शरण येणे म्हणजे जनतेचा उठाव असल्याचे म्हटले. आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. तपास करताना या गुन्ह्यात कोणतेही कच्चे दुवे राहणार नाहीत याचीही पोलिसांनी काळजी घ्यावी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?