AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजपचे जे काही जुने प्लॅन…’, अमित शाह अन् भाजपवर प्रकाश आंबेडकर यांचा मोठा हल्ला

घटनेच्या कालखंडामध्ये सर्वात मोठा विरोध बाबासाहेबांना कोणी केला असेल तर तो भाजप या संघटनेने केला आहे. लोकसभेत अमित शाह यांनी जे वक्तव्य केले आहे त्यातून त्यांची जुनी मानसिकता बाहेर पडलेले आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

'भाजपचे जे काही जुने प्लॅन...', अमित शाह अन् भाजपवर प्रकाश आंबेडकर यांचा मोठा हल्ला
प्रकाश आंबेडकर, अमित शाह
| Updated on: Dec 18, 2024 | 3:29 PM
Share

बहुजन वंचित आघाडीचे नेते डॉ.प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षाला घेरले. अमित शाह यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांनी संघ, भाजप अन् अमित शाह यांच्यावर घणाघाती हल्ला केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, भारतीय जनता पार्टी आता जन्मला आला आहे. त्यांच्या आधी जनसंघ होता. त्याच्या आधी आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) होते. घटनेच्या कालखंडामध्ये सर्वात मोठा विरोध बाबासाहेबांना कोणी केला असेल तर तो या संघटनेने केला आहे. लोकसभेत अमित शाह यांनी जे वक्तव्य केले आहे त्यातून त्यांची जुनी मानसिकता बाहेर पडलेले आहे. यामध्ये नवीन असे काही नाही. त्यांचे जे काही जुने प्लॅन आहेत ते आता अंमलात आणण्यासाठी अडसर काँग्रेस पक्ष नसून बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्याच्यामुळे त्यांचा जळफळाट होत आहे. तोच जळफळाट त्यांच्या वक्तव्यातून बाहेर आला आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

आयोगासमोर सर्व मांडणार…

भिमा कोरेगाव आयोगावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, आयोगाला आम्ही एक पत्र दिले आहे. त्या पत्रामध्ये आम्ही असे म्हणालो आहेत की, पुण्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी दंगलीची बातमी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना केव्हा कळवली. त्यांना ती कळवली नसेल तर का कळवली नाही. त्याचा शोध घेणे हे आयोगाचे मोठे काम आहे. 17 जानेवारी पुन्हा चौकशीसाठी वेळ दिला आहे. त्यावेळेस सर्व गोष्टी मी आयोगासमोर आणणार आहे.

बांगलादेशची वीज बंद करा…

बांगालादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दाही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, बांगलादेश परभणी येवढे आहे. तेथे हिंदूवर अस्त्याचार होत आहे, म्हणून परभणीत मोर्चा काढला गेला. पण केंद्रात तुमची सत्ता आहे. आपण बांगलादेशला वीज देत आहोत. ती बंद करा. त्यांच्या नाड्या आवळणे गरजेचे आहे. एकदा नियंत्रण सुटल की खालपर्यंत नियंत्रण सुटते. मी इथे सगळ काही बोलत नाही. आता वेळ अशी आली आहे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...