AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्री 3 वाजता भर पावसात महावितरणच्या कर्मचाऱ्याने वीज पुरवठा केला सुरळीत, व्हिडिओ व्हायरल

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. सिद्धू आंधळे या वीज कर्मचाऱ्याने जीवावर उदार होऊ मध्यरात्री तीन वाजता वीज पुरवठा सुरळीत सुरु केला आहे. मध्यरात्री पाऊस सुरु होता आणि गावातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. मग सिद्धू आंधळे यांनी रेनेकोट परिधान करुन हातात बॅटरी घेऊन मोर्चा वीज खाबाकडे वळवला.

मध्यरात्री 3 वाजता भर पावसात महावितरणच्या कर्मचाऱ्याने वीज पुरवठा केला सुरळीत, व्हिडिओ व्हायरल
मध्यरात्री तीन वाजता वीज पुरवठा सुरु करणारे सिद्धू आंधळे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 12, 2024 | 9:30 AM
Share

ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला म्हणजे पुन्हा सुरु होणे एक मोठे दिव्यच असते. वीज पुरवठा खंडीत झाल्यावर महावितरण कंपनीचे वायरमन यांचा शोध सुरु होतो. महावितरणच्या कार्यालयात फोन केले जातात. त्यानंतर अनेकदा दखल घेतली जात नाही. यामुळे तासनतास अंधारात ग्रामीण जनतेला राहावे लागते. काही ठिकाणी वायरमन येत नसल्यामुळे इलेक्ट्रीकचे काम करणारे इतर नागरिकांकडून गेला फ्यूज दुरुस्त केला जातो. या सर्व अनुभवांच्या पार्श्वभूमीवर एक आश्चर्य निर्माण करणारी घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. अंधारात मोबाईल टॉर्चचा साहाय्याने मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास जीवावर उदार होत वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने वीज पुरवठा सुरुळीत केला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

असा सुरु केला वीज पुरवठा

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील एक व्हिडिओ समोर आला आहे. सिद्धू आंधळे या वीज कर्मचाऱ्याने जीवावर उदार होऊ मध्यरात्री तीन वाजता वीज पुरवठा सुरळीत सुरु केला आहे. मध्यरात्री पाऊस सुरु होता आणि गावातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. मग सिद्धू आंधळे यांनी रेनेकोट परिधान करुन हातात बॅटरी घेऊन मोर्चा वीज खाबाकडे वळवला. भर पावसात कमरे एवढ्या पाण्यातून वाट काढत झाडावर चढून वीज पुरवठा सुरळीत केला. सिद्धू आंधळे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या या कामाचे कौतूक होत आहे.

इतरांना मार्गदर्शक ठरणारे काम

वादळ आणि पाऊस आला म्हणजे वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार अनेकवेळा घडतो. त्यावेळी तो सुरुळीत करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात फोन करणाऱ्यांना ग्राहकांनी वेगवेगळे अनुभव येतात.

कधी फोन उचलले जात नाही, कधी फोन उचलले तर पाऊस थांबवल्यावर कर्मचारी जातील, कधी मोठा फॉल्ट झाला आहे, दुरुस्त होण्यास बराच वेळ लागले, अशी उत्तरे दिले जातात. परंतु आता इगतपुरी तालुक्यातील सिद्धू आंधळे यांनी केलेली कामगिरी महावितरणच्या इतर कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली