AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संख्याबळ असताना का घाबरले? घोडेबाजार का? नशा उतरलीच पाहिजे; संजय राऊत भाजपवर जोरदार बरसले

विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या घडामोडींवरून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी १५० कोटी रुपयांचा 'घोडेबाजार' झाला. पुण्यापासून कोकणापर्यंत अनेक ठिकाणी माघारींसाठी हे पैसे वापरले गेले. राऊतांनी सत्ताधाऱ्यांच्या बहुमतावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाशी विसंगती दाखवली.

संख्याबळ असताना का घाबरले? घोडेबाजार का? नशा उतरलीच पाहिजे; संजय राऊत भाजपवर जोरदार बरसले
संजय राऊतांचे टीकास्त्र
| Updated on: Jun 05, 2026 | 11:00 AM
Share

विधान परिषदेच्या निवडणुकांसाठीचे अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत यासाठी काल सर्वच पक्षातून प्रयत्न सुरू होते, बंडखोरांची मनधरणी करण्यात येत होती. काही ठिकाणी यश आलं. तर काही भागात प्रामुख्याने महाविकास आघाडील धक्का बसला. या सर्व घडमोडीनंतर आता ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. अर्ज मागे घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा आरोप राऊतांनी केला होता. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा या विषयावर प्रतिक्रिया दिली.

पुरेसं संख्याबळ असतानाही घोडेबाजार का ?

दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये खर्च केले. पुण्यातील माघार, छत्रपचती संभाजीनगरमधील , कोकणातील माघार.. आज मी ट्टिटही केलंय. याशिवाय आणखी तीन ठिकाणीही माघार घेतल्याचे दिसून आले. माघारी आणि बिनविरोध यासंदर्भात जे व्यवहार झाले, त्यासाठी 150 कोटी रुपये खर्च आले. ज्या 11 निवडणुका होणार आहे, तेथेहीव मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले जातात. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना माझं असं म्हणणं आहे की, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना, मग असं असताना तुम्ही हा घोडेबाजार का करताय ? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

पंतप्रधान म्हणतात खर्च टाळा, मग पैसे उडवायची परवानगी आहे का ? 

मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, तुमच्याकडे जिंकून येण्याचं संख्याबळ आहे, यंत्रणा आहे, तरीही तुम्ही बिनविरोध , माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय, घोडेबाजार का करताय ? एका बाजूले देशाचा पंतप्रधान मोदी म्हणतात काटकसर करा , मोठे कार्यक्रम करू नका, गाड्या- घोडे उडवू नका. मग अशा प्रकारे ( विधान परिषद निवडणुकांमध्ये) पैसे उडवायला परवानगी दिली आहे का ? असा खोच सवाल राऊत यांनी विचारला. कोटी कोटी रुपये उडवायला परवानगी दिली आहे का , कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले. त्यातले 15 कोटी रुपये बीकेसीतल्या एका हॉटेलमध्ये दिले, असा आरोप राऊत यांनी केला. छ. संभाजीनगरमध्येही तेवढीच रक्कम देण्यात आली. पुण्यातले आकडे तर आज प्रसिद्धच झाले आहेत. उमेदवारीच्या बदल्यात उमेदवारी देणाऱ्यांना काय दिलंय हे समोर आलंय, असं ते म्हणाले.

भाजपच्या कृपेने महाराष्ट्राच जे चित्र निर्माण झालंय, ते फक्त लोकशाहीला कलंक लावणारं नाही तर या महाराष्ट्राची प्रतिमा, प्रतिभा, संस्कृती यांनाही काळीमा फासणारा हा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका राऊतांनी केली. तुमच्याकडे (सत्ताधारी) पुरेसं नव्हे तर पाशवी संख्याबळ आहे, पाशवी.. तरीही तुम्ही हे उद्योग का करत आहात ? तुम्हाला ही नशा चढली आहे, पैसे उडवायचे, माणसं विकत घ्यायचीच आहेतच. लोक पहात आहेत आणि आता झुरळं पण रस्त्यावर उतरायला लागली आहेत. तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेलं, असं राऊतांनी सुनावलं.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त