AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha Lockdown | वर्ध्यात खबरदारी म्हणून लॉकडाऊनमध्ये वाढ, आणखी 5 दिवस निर्बंध कायम

वर्धा जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील लॉकडाऊन पाच दिवसांसाठी वाढवला आहे. (wardha district lockdown corona pandemic)

Wardha Lockdown | वर्ध्यात खबरदारी म्हणून लॉकडाऊनमध्ये वाढ, आणखी 5 दिवस निर्बंध कायम
महाराष्ट्र लॉकडाऊन
| Updated on: May 12, 2021 | 7:46 PM
Share

वर्धा : राज्य सध्या कोरोनाच्या ( Corona pandemic) दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. राज्यात रोज हजारो नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. सध्या रुग्णसंख्या काहीशी कमी होताना दिसत असली तरी अजूनही धोका टळलेला नाही. हीच गोष्ट लक्षात घेता वर्धा जिल्हा प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील लॉकडाऊन पाच दिवसांसाठी वाढवला आहे. याआधी लॉकडाऊनची मुदत ही 13 मे पर्यंत होती. मात्र, आता लॉकडाऊन 18 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. (Wardha district administration extended Lockdown for Five days amid Corona pandemic)

जिल्ह्यातील लॉकडाऊन वाढवला

कोरोना साखळी तोडण्यासाठी वर्धा जिल्ह्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये आणखी पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. नव्या निर्णयाअंतर्गत 18 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू असतील. यापूर्वी वर्धा जिल्हा प्रशासनाने 8 मे ते 13 मे पर्यंत कडक लॉकडाऊन लागू केला होता. त्याची मुदत उद्या (13 मे रोजी) संपणार आहे. मात्र, मुदत संपली असली तरी, येथे अजूनही कोरोना रुग्णांची संख्या म्हणावी तेवढी कमी झालेली नाही. त्यामुळेच जर निर्बंधांमध्ये शिथिलता दिली तर पुन्हा एकदा रुग्णांचा भडका उडू शकतो. परिणामी येथील परिस्थिती गंभीर होऊ शकते. याच कारणामुळे जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजीपाला थेट घरपोच देण्यासाठी नियोजन

सध्या लागू केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नागरिकांना भाजीपाला घरपोच देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची मदत घेण्यात येत असून भाजीपाला शेतकऱ्यांकडून घेऊन तो थेट ग्राहकांना घरपोच पोचवण्याचं नियोजन प्रशासन करत आहे.

नियम मोडल्यास कडक कारवाई होणार

दरम्यान, सध्या वर्धा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला असून प्रशासनाकडून त्याची चोखपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद असतील. तसेच या काळात विनाकारण घराबाहेर पडल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. बेकरी, मिठाई इत्यादी दुकानेसुद्धा या काळात बंद असतील.

इतर बातम्या :

ठाण्यात कोरोना बळींची संख्या का वाढली?; महापालिका आयुक्तांनी दिलं ‘हे’ कारण!

अरे देवा! अमरावतीत म्युकरमायकोसिसचा शिरकाव; प्रशासनात खळबळ

Maharashtra Coronavirus LIVE Update : दिलासादायक ! नागपुरात कोरोनाबधितांच्या तुलनेत बरं होणाऱ्यांची संख्या वाढली

(Wardha district administration extended Lockdown for Five days amid Corona pandemic)

Follow Us
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?