AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रीची वेळ होती, भरधाव कारची ट्रकला धडक; तीन जणांचा झाला घात

काल रात्री कारने थेट ट्रकला धडक दिली. यात कार ट्रकवर आदळून अपघात झाला. ही वाहनं नागपूरकडं येत होती.

रात्रीची वेळ होती, भरधाव कारची ट्रकला धडक; तीन जणांचा झाला घात
| Edited By: | Updated on: Apr 02, 2023 | 10:32 AM
Share

वर्धा : दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावरील वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. आता रात्री एक मोठा अपघात झाला. समृद्धी महामार्गाने वेग वाढवला. पण, आता या वेगाचे बळी जाताना दिसत आहेत. काल रात्री कारने थेट ट्रकला धडक दिली. यात कार ट्रकवर आदळून अपघात झाला. ही वाहनं नागपूरकडं येत होती. कार ट्रकवर आदळल्याचे दिसत आहे. दोन डॉक्टरांचा मृत्यू झाला.

या तिघांचा झाला मृत्यू

नागपूरकडे येणाऱ्या कारने नागपूरकडे येणाऱ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. ज्योती क्षीरसागर, भरत क्षीरसागर, ( दोघेही रा. मालेगाव, वाशिम) आणि अमरावतीची फाल्गुनी सुरवाडे या तिघांचा मृत्यू झाला. ही घटना रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

कोटंबा शिवारातील घटना

समृध्दी महामार्गावर भरधाव कारने ट्रकला मागाहून धडक दिली. त्यात कारमधील तिघांचाही जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. वर्धा जिल्ह्यातील सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोटंबा शिवारात हा भीषण अपघात घडला. शनिवारी १ एप्रिल रोजी रात्री 11 च्या सुमारास हा अपघात घडला.

कारमधील तिघेही ठार

समृध्दी महामार्गावर एमएच ४० बी एल ८२३५ क्रमांकाचा ट्रक नागपूरकडे जात होता. दरम्यान नागपूरकडे जात असलेल्या एमएच ३७ जी ३५५८ क्रमांकाच्या अनियंत्रित झालेल्या कारने ट्रकला मागून धडक दिली. त्यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात कारचालक डॉक्टर ज्योती क्षीरसागर, भरत क्षीरसागर राहणार मालेगाव, जिल्हा वाशिम आणि डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे राहणार अमरावती यांचा मृत्यू झाला.

मृतक ज्योती आणि फाल्गुनी या मैत्रिणी डेंटिस्ट डॉक्टर होत्या, असं सांगण्यात आलं. नागपूरला कामानिमित्त जात असताना हा अपघात घडला. घटनास्थळी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मोहन पारिसे, ज्ञानेश्वर कोराते, विनोद कोडापे यांनी भेट दिली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी सेलू पोलिसांनी नोंद केली.

घाटात दरी कोसळून एक ठार

दुसऱ्या एका घटनेत, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात गाडी दरीत कोसळली. सायंकाळच्या सुमारास हा अपघात झालाय. यात सुनील चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. सुनील चव्हाण हे कोल्हापूरहून अणुस्कुरा घाट मार्गाने पाचलला येत होते. तीव्र उताराहून स्विफ्ट गाडी जवळपास 300 फुटाच्या आसपास दरीत कोसळून सुनील चव्हाण यांचा जागीच मृत्यू झालाय.

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.