
महाराष्ट्राला आज मोठा धक्का बसला. सकाळी 9.30 च्या सुमारास सर्वप्रथण अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी आली. काहीवेळाने अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची बातमी आली. ही बातमी ऐकल्यानंतर अनेकांना विश्वासच बसत नव्हता. आपले लाडके दादा आपल्यात नाहीत, हे सत्य पचवण खूप कठीण आहे. कारण महाराष्ट्राच्या विकासासाठी बरच काही करणारा आणि करु शकणारा एक नेता आपल्यातून आज निघून गेलाय. अजित पवार यांचं निधन हे महाराष्ट्राच कधीही न भरुन निघणारं नुकसान आहे. दादांची काम करण्याची पद्धत, शैली आणि प्रशासनावर हुकूमत असलेले नेते महाराष्ट्राच्या राजकारणात आज फार कमी आहेत. अजित पवारांची अकाली एक्झिट खरच महाराष्ट्राच्या प्रत्येक जनमनाला चटका लावणारी आहे. एवढं उमदं नेतृत्व वेळेआधीच आज आपल्यातून निघून गेलं.
राज्य आज एका मोठ्या धक्क्यात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ही दुर्घटना नक्की कशी घडली असावी? तांत्रिक बाजू काय सांगतात? याबाबतीत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे हे टीव्ही 9 मराठीशी बोलले.
विमान दुर्घटने प्रकरणी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी चार शक्यता वर्तवल्या आहेत
पहिलं कारण हे कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर ब्लॅक बॉक्स याच्यामधून कळेल. प्राथमिक दृष्ट्या विमान लँड होण्यासाठी 100 मीटर राहिले असताना पायलटची चुकी असू शकते.
दुसरं कारण म्हणजे सकाळच्या वेळी विमान लँड होत असताना दृश्य मानता कमी असल्यामुळे अपघात होऊ शकतो.
तिसरं कारण विमानाच्या इंजिन मध्ये काही चूक होती का? 2010 पासून हे विमान कार्यरत आहे हे विमान अद्यावत आहे. यामुळे ही शक्यता कमी वाटते.
चौथं कारण म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोलर आणि पहिलं त्यांच्यामध्ये काही मिस कम्युनिकेशन झालं का? ही चार कारण असू शकतात.
या चार कारणांपैकी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्यूमन एरर म्हणजे पायलटची चुकी कारणीभूत ठरलेली असू शकते.