AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघ म्हणजे नेमकं काय? मोहन भागवत यांनी एका वाक्यात अर्थ सांगितला

संघ म्हणजे काय? संघाचा अर्थ काय यावर स्पष्टीकरण देताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे, ते पुण्यामध्ये बोलत होते.

संघ म्हणजे नेमकं काय? मोहन भागवत यांनी एका वाक्यात अर्थ सांगितला
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 27, 2025 | 8:12 PM
Share

संघ म्हणजे काय? संघाचा अर्थ काय यावर स्पष्टीकरण देताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. संघ म्हणजे काय? तर संघ म्हणजे आपलेपणा एवढे सरळ साधं संघाचे वर्णन आहे, संघ करतो काय तर हिंदूंचं संघटन,  आपण एकाच तत्वाचे आहोत म्हणजे आपले आहोत, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ते पुण्यामध्ये बोलत होते.

नेमकं काय म्हणाले भागवत? 

मनुष्याला बुद्धी दिलेली आहे, तो विचार करतो आणि त्याच्यामुळे तो आहे त्याच्यापेक्षाही चांगला होऊ शकतो. बुद्धी उलटी चालवली तर आहे त्याच्यापेक्षा वाईटही होऊ शकतो, तो वाईट होत नाही याचं कारण त्याला आपलेपणा जाणवतो. संघ काय काम करतो? समाजाला आपलेपणाचा विसर पडत चाललेला आहे,  त्याची आठवण संघ करून देतो, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, स्वामी सेवकाचं काम काय शक्यतो संस्कार बंद करायचे आणि आपल्या संपर्कात येणाऱ्याची निस्वार्थ बुद्धीने सेवा करायची आणि सेवा सर्व शक्तीनिशी करायची,  आजकाल मधून -मधून लोक इंग्रजीत बोलतात, लोकांना इंग्रजीत बोलायची जास्त सवय आहे, इंग्रजीत बोललं म्हणजे काहीतरी पहिल्यांदाच सांगतो आहे, असं वाटतं. म्हणून गिव्हिंग बॅक असा शब्दप्रयोग करतात, गिव्हिंग बॅक हे इंग्रजी शब्द आता आले, आपल्याकडे फार पूर्वीपासून आहेत, हा आपलेपणा ओळखायचा हे जीवनाचे एक कर्तव्य आहे ,आणि आपलेपणा ओळखून आपलेपणाने वागायचं हे दुसरं कर्तव्य आहे.

आम्ही संघात असंच करतो, ही गोष्ट व्हायला पाहिजे. चार स्वयंसेवक विचार करतात विचार करायला सुरुवात करतात ही सगळी कामं उभी राहिलेली आहेत, ही काम संघाच्या बैठकीत ठरवून उभी राहिलेली नाहीत, ज्या ज्या वेळेला स्वयंसेवकांना जाणवलं त्या त्या वेळेला त्यांनी काम सुरू केलं. जे दीर्घकालीन काम आहे, हे चालू शकतं त्यांना मदतीची आवश्यकता आहे, मग संघटना त्यासाठी मदत करते, असं यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.