AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर शिंदे गटाच्या मंत्र्याची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्रात पुन्हा…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संपूर्ण महाराष्ट्रात राज्यपाल हटाव मोहीम सुरू झाली होती.

भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर शिंदे गटाच्या मंत्र्याची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्रात पुन्हा...
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 12, 2023 | 11:52 AM
Share

जळगाव : महाराष्ट्रासह देशातील राज्यपाल ( Governor Maharashtra ) आणि उपराज्यपाल यांच्या नियुक्ती संदर्भात राष्ट्रपती भवनाकडून नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsinhg Koshyari ) यांच्या राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर करत राज्यपाल पदी रमेश बैस ( Ramesh Bais )  यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यावर महाविकास आघाडीसह विविध नेते प्रतिक्रिया देत असतांना शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. यावर शिंदे गटाचे अर्थात बाळसाहेबांची शिवसेना या पक्षाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, त्यावेळी बोलत असतांना त्यांनी भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मानसिकता राजीनामा देण्याची होती, त्यांची वेळ पण संपलेली होती, लोकांचा रोष ओढून घेण्यापेक्षा त्यांनी राजीनामा दिला असं गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे.

त्यांच्याकडून ती चांगले कामे झाली त्याबद्दल त्यांचे आभार पण त्यांच्याकडून काही गोष्टी झाल्या असतील , पण पुढच्या काळामध्ये असं होऊ नये अशी सावध प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

कोणीही महाराजांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य करू नये एवढीच अपेक्षा आहे असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी महापुरुषांच्या बद्दल अवमान होईल असे विधान करू नका असं म्हंटलं आहे.

खरंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सुरुवातीपासूनच वादात राहिले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षातील भूमिका असो वा महापुरुषांच्या बाबतीत केले भाष्य असो महाराष्ट्रात नेहमीच वातावरण तापलेले राहिले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संपूर्ण महाराष्ट्रात राज्यपाल हटाव मोहीम सुरू झाली होती.

त्यानंतर समर्थ रामदास यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारणार असं म्हणत कोश्यारी यांनी नवा वाद उभा केला होता, तर गुजराथी आणि राजस्थानी यांनी मुंबई सोडली तर आर्थिक राजधानी राहणार नाही आणि कोणी विचारणार नाही असं म्हंटलं होतं.

एकूणच राज्यपाल पदावर असतांना सर्वाधिक चर्चेत राहिलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राहिले आहे. त्यातच त्यांनी नंतरच्या काळात पदमुक्त करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली होती, त्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर झाला आहे.

भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सडकून टीका करत हल्लाबोल केला आहे. यामध्ये राज्यपाल हटाव मोहीम करण्यात महाविकास आघाडी अग्रस्थानी होती.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच