AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं काय होणार? सत्तासंघर्षाच्या निकालानंतर गणितं बदलणार?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुप्रीम कोर्टातील निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. या घडामोडींदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं काय होणार? सत्तासंघर्षाच्या निकालानंतर गणितं बदलणार?
| Updated on: May 04, 2023 | 11:58 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादीतल्या नाट्याचा येणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाशी कनेक्शन आहे, असा दावा कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंनी केलाय. येत्या 11 तारखेनंतर कधीही कोर्टाचा निकाल येऊ शकतो. त्याआधी राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण याचा फैसला होईल, असं सरोदेंनी म्हटलंय. मात्र जर सत्तासमीकरणं बदलली तर शिंदे आणि ठाकरेंचं काय होणार? हे पाहणंही महत्वाचं आहे. येत्या 15 मे आधी कोणत्याही तारखेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्एषाचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. निकाल जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूनं गेला तर फारशा उलथापालथी होणार नाहीत. मात्र जर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या बाजूनं निकाल लागला, तर शिंदेंचं काय होणार? हा प्रश्न आहे.

विशेष म्हणजे कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांच्या मते 10 तारखेनंतर कधीही निकाल लागू शकतो. पण त्याआधी राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण याचा फैसला होईल. कारण निकाल जर एकनाथ शिंदेंच्या विरोधात गेला तर राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊ शकण्याची चर्चा आहे.

संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यात एकवाक्यता?

शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा करताच अनेक नेत्यांनी पवारांनी राजीनामा मागे घेण्यासाठी विनवण्या केल्या. मात्र जे काल पाया पडत होते, त्यापैकी अनेक नेते भाजपात येण्यसाठी इच्छुक असल्याचा दावा नारायण राणेंनी केलाय. एरव्ही राणे आणि राऊतांच्या दाव्यात एकवाक्यता कधी दिसत नाही. पण जवळपास असाच दावा ‘सामना’तून राऊतांनीही केलाय. राऊत म्हणतायत की, जे आज पायाशी पडले, तेच उद्या पाय खेचू शकतात, याची कल्पना शरद पवारांच्या खेळीत असावी.

शिंदे-ठाकरेंचं काय होणार?

स्वतः एकनाथ शिंदे सध्याच्या घडामोडींवर काही बोलत नाहीयत. मात्र त्यांचे राष्ट्रवादीचा गट फुटण्याचे दावे करतायत. दुसरीकडे जर राष्ट्रवादीचा गट भाजपसोबत गेला तर ठाकरेंचं काय होणार? हा सुद्धा प्रश्न आहे. कारण, उद्धव ठाकरेंनी न विचारता दिलेला मुख्यमंत्रीपदाचा राजीनाम्यासह अनेक मुद्दे पवारांनी आत्मचरित्रात लिहिले आहेत.

मविआची वज्रमूठ सभा रद्द झालीय. शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. अध्यक्षपदावरुन राष्ट्रवादीत राजीनामासत्रही सुरु झालंय. इकडे भाजप नेते आणि कायदामंत्री किरेन रिजीजू विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना भेटले आहेत. थोडक्यात जे येत्या 10 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात घडेल, त्यावरच 2024 मधलं बरचंस चित्र स्पष्ट होणार आहे. म्हणून यापुढचे काही दिवस भाजप-राष्ट्रवादीबरोबरच शिंदे आणि ठाकरेंसाठी सर्वाधिक महत्वाचे आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.