AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा निवडणुकीनंतर काय होणार? निकालाबाबत शरद पवार यांची मोठी भविष्यवाणी!

शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, निकालाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे, ते इंदापूरमध्ये बोलत होते.

विधानसभा निवडणुकीनंतर काय होणार? निकालाबाबत शरद पवार यांची मोठी भविष्यवाणी!
Image Credit source: ANI
| Updated on: Nov 03, 2024 | 4:53 PM
Share

विधानसभा निवडणुकींच बिगूल वाजलं आहे, हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना पक्षाकडून इंदापूरमधून उमेदवारी देण्यात आली. मात्र ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देण्यात आल्यानं इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी नाराज आहेत, या बंडखोरीचा फटका हा हर्षवर्धन पाटील यांना निवडणुकीत बसण्याची शक्यता असल्यानं आता हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज राष्ट्रवादी पवार गटाचे नाराज नेते भरत शाह यांची इंदापूरमध्ये येऊन भेट घेतली. दरम्यान या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच निवडणुकीच्या निकालाबाबत देखील त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार? 

लोकसभेला आपण चांगल्या रीतीने काम केलं. महाराष्ट्र एकेकाळी 1 नंबरचे राज्य होते. आता 1 नंबरचा महाराष्ट्र 6 व्या नंबरवर गेला आहे. राज्यकर्त्यांकडून राज्याकडे दुर्लक्ष झालं आहे. कापूस, ऊसाबद्दल सरकारचं धोरण शेतकरी विरोधी आहे. देशात महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेशमध्ये तयार होणारी साखर देशाची गरज भागून शिल्लक साखर आपण बाहेर पाठवतो. पण साखर बाहेर पाठवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यामुळे साखरेचे दर कमी होतील आणि उसाचे पण दर कमी होतील. केंद्र सरकारकडे आम्ही प्रश्न उपस्थित केला, तेव्हा उत्तर दिलं तुम्ही पिकवणाऱ्याचा विचार करता आम्ही खाणाऱ्यांचा करतो, असं पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की,  दुष्काळ पडला तेव्हा अमेरिकेकडून गहू मागवावा लागला. आम्ही सत्तेत होतो तेव्हा शेतीमालाच्या किमती वाढून दिल्या. या भागात प्रचंड ऊस आणि केळीचे पीक आहे. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. उद्याच्या निवडणुकीत सत्ताबदल करण्याशिवाय पर्याय नाही. मी अनेक ठिकाणी जातो, राज्यातील लोकांना बदल हवा आहे, असं सूचक विधानही शरद पवार यांनी यावेळी केलं आहे. दरम्यान मोठया मतांनी हर्षवर्धन पाटील यांना विजयी करा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

Follow Us
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा