AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापूरमध्ये कोरोनाकाळात 35 कोटींचा भ्रष्टाचार?, भाजपच्या आरोपाने खळबळ

कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोरोनाकाळात साहित्य खरेदीत तब्बल 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी केलाय (kolhapur jilha parishad corruption)

कोल्हापूरमध्ये कोरोनाकाळात 35 कोटींचा भ्रष्टाचार?, भाजपच्या आरोपाने खळबळ
सांकेतिक फोटो
| Updated on: Mar 02, 2021 | 3:03 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोरोनाकाळातील साहित्य खरेदीत तब्बल 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी केलाय. मास्क, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, बेड अशा प्रकारचे साहित्य खरेदी करताना हा गैरव्यवहार करण्यात आल्याचं निंबाळकर यांनी म्हटलंय. त्यांच्या या आरोपामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. (while purchasing medical instruments in Corona pandemic Kolhapur Jilha Parishad made corruption of 35 crore BJP alleged)

खरेदी व्यवहरात अनेक त्रुटी

कोरोना संसर्गाला थोपवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून अनेक सामानाची खरेदी करण्यात आली. यामध्ये मास्क, थर्मल स्कॅनर, बेड अशा विविध गोष्टींचा समावेश होता. मात्र, या व्यवहारात तब्बल 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचं राजवर्धन निंबाळकर यांनी म्हटलंय. तसेच, त्यांच्या या दाव्याला पुष्टी म्हणून त्यांनी लेखापरीक्षणाचा दाखला दिला आहे. कोरोना काळात वेगवेगळ्या साहित्याची खरेदी करण्यात आली. ही खरेदी अव्वाच्या सव्वा दराने केली गेली. तसेच, कोरोना काळात झालेल्या साहित्य खरेदीच्या लेखापरीक्षणातील अनेक त्रुटी लेखापरीक्षकांनी स्पष्टपणे निदर्शनाला आणून दिल्या आहेत, असे म्हणत त्यांनी काही राजकीय मंडळींच्या नातेवाईकांना पोसण्यासाठी ऐन वेळी तयार झालेल्या फर्मकडून ही खरेदी केली गेली, असा गंभीर आरोपीही त्यांनी केलाय.

अन्यथा न्यायालयीन लढाई लढू

यावेळी या भ्रष्टाचाराची कसून चौकशी व्हायला हवी अशी मागणी राजवर्धन निंबाळकर यांनी केली. तसेच, राज्य सरकारने जर या प्रकराची दखल घेतली नाही; तर प्रसंगी जनहित याचिकेद्वारे न्यायालयीन लढाई लढू ,असा इशारादेखील यावेळी निंबाळकर यांनी दिलाय.

दरम्यान, जिल्हा परिषदेत झालेला घोटाळा मोठा असून त्याची निष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी असे म्हणत त्यांनी या घोटाळ्यात सामील असणाऱ्या राजकीय मंडळी आणि अधिकाऱ्यांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या खुलाशाने कोल्हापुरातील राजकीय गोटात खळबळ उडाली असून निंबाळकर आगामी दिवसांत नेमका कोणता खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

इतर बातम्या :

“आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण मांडीखाली दाबलेले आमदार मोकळे करा”, संजय राऊतांचा कोश्यारींना टोला

शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला, हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना टोला, लेकाचा 2029 चा आमदार उल्लेख

“पंकजा मुंडेंची मागणी योग्यच, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा”

(while purchasing medical instruments in Corona pandemic Kolhapur Jilha Parishad made corruption of 35 crore BJP alleged)

वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.