AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्टात मुली नेमक्या कुणाला नकोत? कोणत्या जिल्ह्यांनी ‘बेटी बचाव’चा नारा सार्थ ठरवला? वाचा सविस्तर

महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या आणखी घटल्याची माहिती नॅशनल फॅमिल हेल्थच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आलीय. ही बाब महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे.

महाराष्टात मुली नेमक्या कुणाला नकोत? कोणत्या जिल्ह्यांनी 'बेटी बचाव'चा नारा सार्थ ठरवला? वाचा सविस्तर
Girl
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 3:42 PM
Share

महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या आणखी घटल्याची माहिती नॅशनल फॅमिल हेल्थच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आलीय. ही बाब महाराष्ट्राची चिंता वाढवणारी आहे. पुण्यात -54 अंकांची घट झालीय, तर इतर तब्बल 17 जिल्ह्यातही मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या घटली आहे. राज्यातली आकडेवारी आणखी धक्कादायक आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत 11 अंकांची घट झाली आहे. पाच वर्षांपूर्वी 1 हजार मुलांच्या तुलनेत 924 मुली होत्या ती आकडेवारी आणखी घटून 1000 मुलांमागे केवळ 913 मुली आहेत.

मुली नेमक्या नकोत कुणाला?

हा सर्वे राज्यातील लोकांची मानसिकता दर्शवणारा आहे. पुणे, हिंगोली, औरंगाबाद, भंडारा, मुंबई, बीड, जालना जळगाव जिल्यात मुलींची संख्या 1000 मुलींच्या तुलनेत 900 च्या खाली आली आहे. औरंगाबादेत तर ही आकडेवारी आणखी घटून 875 वर आली आहे. गेल्या सर्वेक्षाच्या तुलनेत ही सर्वात मोठी घट आहे. भंडाऱ्यात गेल्या सर्वेक्षणावेळी 1000 मुलांमागे 1204 मुली होत्या ती संख्या आता मोठ्या प्रमाणत घटली आहे. आता ती आकडेवारी 1000 मुले, 897 मुली अशी झाली आहे. तर बीड हिंगोली भडाऱ्यातही हा फरक वाढत गेलाय.

यांनी ‘बेटी बचाव’चा नारा सार्थ ठरवला

अमरावती, गडचिरोरीली, धुळे उस्मानाबाद या जिल्ह्यांनी बेटी बचावचा नारा सार्थ ठरवला आहे. अमरावतीत 1090 मुली 1000 मुली अशी आकडेवारी आहे. गोंदिया, कोल्हापूर, लातूरमध्ये मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी असणारे जिल्हे जास्त असल्यानं अजून मानसिकता बदलण्याची गरज असल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट जाणवतंय. अनेकांना अजून वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असतो. त्यामुळे ही मोठी तफावत दिसून येतेय.

Video: जिराफाची छेड काढणं गेंड्याला महागात, लोक म्हणाले, आता हा कुणाच्याच वाटेला जाणार नाही!

Rajesh tope : कोविडनं मृत्यू झालेल्या कुटुंबियांना 50 हजाराची मदत नेमकी कधी मिळणार? अटी काय? टोपे म्हणतात

Omicron Variant: ओमिक्रॉन म्हणजे काय? कसा लागला या वेरिएंटचा शोध?

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.