AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Adhav : एक गाव एक पाणवठ्याचा राखणदार गेला… कोण होते बाबा आढाव? नव्या पिढीला माहीतच हवे

Baba Adhav Biography : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुणे येथे झाला होता, त्यांनी कष्टकरी आणि मजुरांसाठी केलेले काम नेहमी लक्षात राहण्याजोगे आहे. त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊयात.

Baba Adhav : एक गाव एक पाणवठ्याचा राखणदार गेला... कोण होते बाबा आढाव? नव्या पिढीला माहीतच हवे
Baba Adhav JourneyImage Credit source: Google
| Updated on: Dec 08, 2025 | 10:11 PM
Share

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे प्रतिनिधी : राज्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. बाबा आढाव गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. बाबा आढाव यांचे सामाजिक कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी होते. त्यांनी कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांचा जीवन प्रवास सविस्तर जाणून घेऊयात.

पुण्यात जन्म

बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव असे आहे. ते एक सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी असंघटित कामगारांसाठी आयुष्य वेचलं. तसेच त्यांनी साहित्य क्षेत्रातही योगदान दिले.त्यांनी रिक्षाचालक, हमाल, हातगाडी ओढणारे आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी मोठा लढा दिला.

हमाल पंचायतीची स्थापना

पुणे शहरात त्यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे आणि त्यांना आदराने ‘पुणे शहराचे कुटुंब प्रमुख’ असेही म्हटले जाते. त्यांनी पुणे येथे ‘हमाल पंचायत’ आणि ‘असंघटित कामगार कर्मचारी महासंघ’ यांसारख्या संस्था स्थापन केल्या. अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ ही चळवळ सुरू केली, जी अत्यंत गाजली. त्यांनी दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठीही काम केले. बाबा आढाव यांनी सामाजिक विषयांवर आणि आपल्या चळवळींवर आधारित अनेक पुस्तके आणि लेख लिहिले आहेत.

बाबा आढाव यांचे साहित्य

बाबा आढाव यांनी सामाजिक चळवळी आणि कष्टकरी वर्गाचे जीवन दर्शवणारे महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या प्रमुख पुस्तकांमध्ये ‘एक गाव – एक पाणवठा’,त्यांचे आत्मचरित्रात्मक लेखन ‘मीच तो माणूस’ आणि ‘एक साधा माणूस’, ‘जगरहाटी’, ‘रक्ताचं नातं’, ‘असंघटित कामगार : काल, आज आणि उद्या’, ‘जातपंचायत : दाहक वास्तव’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक चिंतन’ ही काही महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांनी वाचकांच्या मनावर खोल प्रभाव पाडला. बाबा आढाव यांच्या समाज कार्यात या पुस्तकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता बाबा आढाव आपल्यात नाहीत. त्यांचे हे साहित्य आगामी पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड