AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baba Adhav : एक गाव एक पाणवठ्याचा राखणदार गेला… कोण होते बाबा आढाव? नव्या पिढीला माहीतच हवे

Baba Adhav Biography : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुणे येथे झाला होता, त्यांनी कष्टकरी आणि मजुरांसाठी केलेले काम नेहमी लक्षात राहण्याजोगे आहे. त्यांचा जीवन प्रवास जाणून घेऊयात.

Baba Adhav : एक गाव एक पाणवठ्याचा राखणदार गेला... कोण होते बाबा आढाव? नव्या पिढीला माहीतच हवे
Baba Adhav JourneyImage Credit source: Google
| Updated on: Dec 08, 2025 | 10:11 PM
Share

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे प्रतिनिधी : राज्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. बाबा आढाव गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पूना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. बाबा आढाव यांचे सामाजिक कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी होते. त्यांनी कष्टकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी कष्टकरी मजुरांचे संघटन करून त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यांचा जीवन प्रवास सविस्तर जाणून घेऊयात.

पुण्यात जन्म

बाबा आढाव यांचा जन्म 1 जून 1930 रोजी पुणे येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव असे आहे. ते एक सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी असंघटित कामगारांसाठी आयुष्य वेचलं. तसेच त्यांनी साहित्य क्षेत्रातही योगदान दिले.त्यांनी रिक्षाचालक, हमाल, हातगाडी ओढणारे आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना संघटित करून त्यांच्या हक्कांसाठी मोठा लढा दिला.

हमाल पंचायतीची स्थापना

पुणे शहरात त्यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे आणि त्यांना आदराने ‘पुणे शहराचे कुटुंब प्रमुख’ असेही म्हटले जाते. त्यांनी पुणे येथे ‘हमाल पंचायत’ आणि ‘असंघटित कामगार कर्मचारी महासंघ’ यांसारख्या संस्था स्थापन केल्या. अस्पृश्यता निवारण आणि सामाजिक समतेसाठी त्यांनी ‘एक गाव, एक पाणवठा’ ही चळवळ सुरू केली, जी अत्यंत गाजली. त्यांनी दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठीही काम केले. बाबा आढाव यांनी सामाजिक विषयांवर आणि आपल्या चळवळींवर आधारित अनेक पुस्तके आणि लेख लिहिले आहेत.

बाबा आढाव यांचे साहित्य

बाबा आढाव यांनी सामाजिक चळवळी आणि कष्टकरी वर्गाचे जीवन दर्शवणारे महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या प्रमुख पुस्तकांमध्ये ‘एक गाव – एक पाणवठा’,त्यांचे आत्मचरित्रात्मक लेखन ‘मीच तो माणूस’ आणि ‘एक साधा माणूस’, ‘जगरहाटी’, ‘रक्ताचं नातं’, ‘असंघटित कामगार : काल, आज आणि उद्या’, ‘जातपंचायत : दाहक वास्तव’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक चिंतन’ ही काही महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांनी वाचकांच्या मनावर खोल प्रभाव पाडला. बाबा आढाव यांच्या समाज कार्यात या पुस्तकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता बाबा आढाव आपल्यात नाहीत. त्यांचे हे साहित्य आगामी पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.