AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खा. दिलीप गांधींना संसदेत तंबाखू मळायला पाठवलंय का? धनगर नेत्यांचा सवाल

अहमदनगर : नगर जिल्ह्याचे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांची दांडी गूल करा… संसदेत काय तंबाखू मळायला पाठवलंय का? धनगर आरक्षणावर का बोलत नाहीत? असा घणाघात धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी केलाय. धनगर समाजाचा प्रश्न न सोडवल्यास आगामी निवडणुकी भाजपला मतदान न करण्याची शपथ गोपिचंद पडळकर यांनी समाजाला घ्यायला लावली आहे. धनगरांना लोकसभा निवडणुकीपूर्वी एसटी […]

खा. दिलीप गांधींना संसदेत तंबाखू मळायला पाठवलंय का? धनगर नेत्यांचा सवाल
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM
Share

अहमदनगर : नगर जिल्ह्याचे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांची दांडी गूल करा… संसदेत काय तंबाखू मळायला पाठवलंय का? धनगर आरक्षणावर का बोलत नाहीत? असा घणाघात धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी केलाय. धनगर समाजाचा प्रश्न न सोडवल्यास आगामी निवडणुकी भाजपला मतदान न करण्याची शपथ गोपिचंद पडळकर यांनी समाजाला घ्यायला लावली आहे.

धनगरांना लोकसभा निवडणुकीपूर्वी एसटी (अनुसूचित जमाती) प्रमाणपत्र दिलं नाही तर भाजपला मतदान करायचं नाही, अशी रोखठोक भूमिका धनगर गोपिचंद पडळकर यांनी समाजासमोर मांडत तशी शपथही घ्यायला लावली. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजही आता आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. राहुरी येथील धनगर आरक्षण एल्गार मेळाव्यात बोलताना पडळकर यांनी सरकारच्या भूमिकेवर आपली रोखठोक भूमिका मांडली.

राज्यकर्त्यांनी आजवर धनगर समाजाला झुलवत ठेवलं आहे. चार वर्षांपूर्वी भाजपने  आरक्षणाचं आश्वासन दिलं ते पूर्ण केलं नाही. म्हणून आता हा समाजाचा अखेरचा लढा असल्याचं धनगर नेते उत्तमराव जानकर यांनी स्पष्ट करत लोकसभा निवडणुकी अगोदर प्रश्न सोडवा अन्यथा सरकारला खड्ड्यात गाडू, असा इशारा जानकर यांनी राहुरी येथील एल्गार मेळाव्यात दिलाय.

काँग्रेस राष्ट्रवादीने आमची आजवर फसवणूक केली. फक्त काँग्रेसच बेईमान आहे असं नाही. हे भाजपही सत्तेवर आल्यावर बेईमान झालं. येणाऱ्या दहा दिवसात धनगर आरक्षणाचा प्रश्न मिटवा. आता समाजाचा संयम सुटलाय. सरकार काय मंत्रालय जाळण्याची वाट बघतंय का? असा सवाल उत्तमराव जानकर यांनी उपस्थित केलाय.

टाटा इंन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अहवालाची गरज नाही. धनगर समाजाचा मार्ग खडतर झाला असं कोणी म्हणत असतील तर सरकारचा मार्गही खडतर असल्याचं पडळकर म्हणाले.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत