AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramdas Kadam| नगर परिषदेच्या निवडणुकीत गद्दारी करणार नाही; उद्विग्न झालेल्या कदमांचा ठाकरेंना शब्द

नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही गद्दारी करणार नाही, असा शब्द उद्विग्न झालेले आमदार आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना शनिवारी दिला.

Ramdas Kadam| नगर परिषदेच्या निवडणुकीत गद्दारी करणार नाही; उद्विग्न झालेल्या कदमांचा ठाकरेंना शब्द
रामदास कदम आणि उद्धव ठाकरे.
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 1:13 PM
Share

मुंबईः अनिल परबच्या डोक्यात मस्ती गेलीय, हवा गेलीय. त्याचे पाय जमिनीवर नाहीत. मी त्याला पत्रात हरामखोर म्हटलं. या हरामखोराला आवरा. नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही गद्दारी करणार नाही, असा शब्द उद्विग्न झालेले आमदार आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना शनिवारी दिला.

ज्येष्ठांना मंत्रिपद दिलं नाही…

आमदार व माजी मंत्री रामदास कदम म्हणाले की, आमचं वय झालं. ७० वर्ष ओलांडले. त्यामुळे आम्हाला मंत्रिपद देऊ नका, असं मी उद्धव ठाकरेंना सांगितलंय. उद्धव ठाकरे म्हणाले नक्की. मी म्हटलं हो साहेब, पण जेव्हा मंत्र्यांची लिस्ट पाहिली. तेव्हा त्यात सुभाष देसाईंचं नाव पाहिलं. तेव्हा वाईट वाटलं. दुःख झालं. मला मंत्रिपद दिलं नाही म्हणून नाही तर ज्येष्ठांना मंत्रिपद दिलं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

परबांनी शपथ भंग केली…

कदम म्हणाले की, या पुढे आमदारांना निधी देणार नाही, असे परब म्हणतात. अनिल परबच्या बापाचा पैसा आहे का, तू शपथ घेतली त्याचा भंग केला. मी बघेन. उद्धवजींना विचारून घे. तो जिल्हा नियोजन निधीचा पैसा आहे. तुझा नाही. आमदारांचा हक्क आहे. तो निधी मिळाला नाही तर मी कोर्टात जाईल. अनिल परब तुझ्या बापाचा पैसा आहे का? तू निधी न देणारा कोण, असा सवालही त्यांनी केला.

पुढचा निर्णय ठरवणार…

रामदास कदम म्हणाले, पुढे काय करायचं त्याचा निर्णय घेणार. माझी मुलं आणि समर्थकांसोबत चर्चा करू. लवकरच पत्रकार परिषद घेऊ. अन्याय सहन करण्याला मर्यादा असतात. नगर परिषदेच्या निवडणुकाचा निकाल लागल्यावर निर्णय घेऊ. उद्धव साहेबांना हात जोडून विनंती आहे. तुम्ही लक्ष घाला. अनिल परबच्या डोक्यात मस्ती गेलीय. हवा गेली. त्याचे पाय जमिनीवर नाहीत. मी त्याला पत्रात हरामखोर म्हटलं. या हरामखोराला आवरा. नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही गद्दारी करणार नाही, असा शब्दही त्यांनी दिला.

शिवसेनेतून बाहेर पडणार नाही…

कदम म्हणाले, मी शिवसेनेतून कदापी बाहेर पडणार नाही. मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. माझ्या मुलाच्या भवितव्याची चिंता आहे. ते निर्णय घ्यायला सक्षम आहेत. माझ्या मुलांचं करिअर आता सुरू झालं आहे. त्यावरच घाव घातला जात आहे. पक्षातून काढलं तरी शिवसैनिक म्हणून जगेन. अनिल परब हेच पक्षप्रमुख आहेत. त्यांच्याविरोधात बोललो तर पक्षाच्या विरोधात बोललो असंच आहे. एक महिन्याच्या आत येऊन तुमच्याशी संवाद साधेल, असेही ते म्हणाले.

इतर बातम्याः

Ramdas Kadam: भगव्याची साथ सोडणार का? महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे संकेत? काय म्हणाले रामदास कदम?

Ramdas Kadam| कदमांचे 5 वार; शिवसेना संपवण्याची हरामखोरी मंत्र्यांकडून सुरू, उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कारवाईची मागणी

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला आज जामीन मिळणार का?.
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला MVAचा पाठिंबा?
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला MVAचा पाठिंबा?.
महिलांना 1500 रुपये द्याचे बंद करा, लगेच तुम्हाला ... संजय राऊत यांचा
महिलांना 1500 रुपये द्याचे बंद करा, लगेच तुम्हाला ... संजय राऊत यांचा.
महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत...
महिला आरक्षणावरून फडणवीस–सुळे आमनेसामने; सीरियल लायर म्हणत....
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं...
लिंगपिसाट खरातची तब्येत अचानक बिघडली, ऑक्सिजनवर ठेवलं....
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.