AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांच्या खात्यात एक तारखेला खटाखट तीन हजार रुपये… राहुल गांधी यांची मोठी घोषणा

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना तीन लाख कर्ज माफ होणार आहे. आरक्षण ५० टक्केची मर्यादा रद्द करणार आहे. जातीय जनगणना करणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. बेरोजगारांना 4 हजार रुपये महिना देणार आहे. अडीच लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार आहे.

महिलांच्या खात्यात एक तारखेला खटाखट तीन हजार रुपये... राहुल गांधी यांची मोठी घोषणा
राहुल गांधी
| Updated on: Nov 14, 2024 | 1:16 PM
Share

महाराष्ट्रातील निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. त्यासाठी २० तारखेला होणाऱ्या मतदानासाठी प्रचार रंगात आला आहे. या दोन्ही गटाच्या नेत्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. आता नंदुरबारमध्ये राहुल गांधी यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी अनेक घोषणा केल्या. राहुल गांधी म्हणाले, महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेमुळे महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला खटाखट तीन हजार रुपये मिळणार आहे. तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या खात्यात तीन हजार रुपये दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला बसमध्ये तिकीट मोफत असणार आहे. तुम्ही तिकीट न काढता बँकेत किंवा राज्यभरात कुठेही जाऊ शकणार आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

भारत सरकारमध्ये आदिवासी अधिकारी नाही…

भारत सरकार ९० अधिकारी चालवतात. परंतु त्यामध्ये केवळ एक व्यक्ती आदिवासी आहे. त्या अधिकाऱ्यास मागे बसवले आहे. त्याला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्याला आदिवासी असल्यामुळे काम दिले जात नाही. भारत सरकार शंभर रुपये खर्च करत असेल तर आदिवासी अधिकारी दहा पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतात. आदिवासी देशात आठ टक्के आहे. परंतु त्यांची भागेदारी नाही. माध्यमांमध्ये, तसेच आदाणी, अंबानी यांच्या कंपनीत एक अधिकारी मिळणार नाही. परंतु मजुरांची यादी केली तर त्यामध्ये आदिवासी मिळतात. आदिवासींना सरकारमध्ये अधिकार मिळावे, सत्तेत वाटा मिळावा, आदिवासी अधिकारी व्हावे, ही आम्ही करु, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना तीन लाख कर्ज माफ होणार आहे. आरक्षण ५० टक्केची मर्यादा रद्द करणार आहे. जातीय जनगणना करणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. बेरोजगारांना 4 हजार रुपये महिना देणार आहे. अडीच लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार आहे. सरकार आल्यास गरिबाला उपचारासाठी राज्यात 25 लाखापर्यंत विमा सुरक्षा देणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.