AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांच्या खात्यात एक तारखेला खटाखट तीन हजार रुपये… राहुल गांधी यांची मोठी घोषणा

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना तीन लाख कर्ज माफ होणार आहे. आरक्षण ५० टक्केची मर्यादा रद्द करणार आहे. जातीय जनगणना करणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. बेरोजगारांना 4 हजार रुपये महिना देणार आहे. अडीच लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार आहे.

महिलांच्या खात्यात एक तारखेला खटाखट तीन हजार रुपये... राहुल गांधी यांची मोठी घोषणा
राहुल गांधी
| Updated on: Nov 14, 2024 | 1:16 PM
Share

महाराष्ट्रातील निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. त्यासाठी २० तारखेला होणाऱ्या मतदानासाठी प्रचार रंगात आला आहे. या दोन्ही गटाच्या नेत्यांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. आता नंदुरबारमध्ये राहुल गांधी यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी अनेक घोषणा केल्या. राहुल गांधी म्हणाले, महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेमुळे महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला खटाखट तीन हजार रुपये मिळणार आहे. तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या खात्यात तीन हजार रुपये दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला बसमध्ये तिकीट मोफत असणार आहे. तुम्ही तिकीट न काढता बँकेत किंवा राज्यभरात कुठेही जाऊ शकणार आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

भारत सरकारमध्ये आदिवासी अधिकारी नाही…

भारत सरकार ९० अधिकारी चालवतात. परंतु त्यामध्ये केवळ एक व्यक्ती आदिवासी आहे. त्या अधिकाऱ्यास मागे बसवले आहे. त्याला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्याला आदिवासी असल्यामुळे काम दिले जात नाही. भारत सरकार शंभर रुपये खर्च करत असेल तर आदिवासी अधिकारी दहा पैसे खर्च करण्याचा निर्णय घेतात. आदिवासी देशात आठ टक्के आहे. परंतु त्यांची भागेदारी नाही. माध्यमांमध्ये, तसेच आदाणी, अंबानी यांच्या कंपनीत एक अधिकारी मिळणार नाही. परंतु मजुरांची यादी केली तर त्यामध्ये आदिवासी मिळतात. आदिवासींना सरकारमध्ये अधिकार मिळावे, सत्तेत वाटा मिळावा, आदिवासी अधिकारी व्हावे, ही आम्ही करु, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना तीन लाख कर्ज माफ होणार आहे. आरक्षण ५० टक्केची मर्यादा रद्द करणार आहे. जातीय जनगणना करणार आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले. बेरोजगारांना 4 हजार रुपये महिना देणार आहे. अडीच लाख तरुणांना सरकारी नोकरी देणार आहे. सरकार आल्यास गरिबाला उपचारासाठी राज्यात 25 लाखापर्यंत विमा सुरक्षा देणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.