AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किल्ल्याच्या गेटजवळ केक कापला अन् 3 लेकरांना… अश्विनी पौळ प्रकरणात धक्कादायक खुलासा

कुस्तीच्या खेळाडू अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह धक्कादायक निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली. अश्विनी यांच्या आयुष्यात मोठे वादळ आल्याचे यावरून दिसतंय.

किल्ल्याच्या गेटजवळ केक कापला अन् 3 लेकरांना... अश्विनी पौळ प्रकरणात धक्कादायक खुलासा
Ashwini Paul
| Updated on: Sep 04, 2026 | 1:36 PM
Share

श्रीराम क्षीरसागर धाराशिव : नळदुर्ग किल्ल्यावर धक्कादायक घटना घडली. धाराशिवच्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर घडललेल्या घटनेने एकच खळबळ उडाली. कुस्तीच्या खेळाडू अश्विनी मनोहर पौळ यांनी आपल्या तीन मुलांना घेऊन किल्ल्यातील उपळी बुरुजावरून उडी घेतली. यादरम्यानच आता गंभीर आरोप केली जात आहेत. अश्विनी पौळ यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप केली जात आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून अश्विनी मोठ्या त्रासात होती. सासरच्या मंडळीकडून अतोनात त्रास तिला दिला जात होता. एका राष्ट्रीय कुस्ती खेळाडूवर ही वेळ आली. नवऱ्याकडून सातत्याने मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. तीन महिन्यांपासून मोठा कलह आयुष्यात सुरू होता. आता या प्रकरणात मोठी माहिती पुढे येतंय. आपल्या तीन लेकरांना किल्ल्यावर घेऊन जाताना अश्विनी पौळ यांनी अगोदर किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ केक कापला.

तो केक आपल्या लेकरांना खाऊ घातला. त्यानंतर किल्ल्यावर जाऊन हा धक्कादायक निर्णय घेतला. अश्विनी पौळ या आपल्या मुलांना किल्ला दाखवण्यासाठी घेऊ आल्या. पण त्यांच्या मनात काही वेगळेच सुरू होते. पूर्ण कुटुंब केक आपल्यासोबत घेऊन आले होते. यादरम्यान तेथील कर्मचाऱ्याने अश्विनी पौळ यांना सांगितले की, केक घेऊन किल्ल्यावर जाता येत नाही.

त्यावेळी अश्विनी प्रवेशव्दारावरच केक कट केला आणि अश्विनी आपल्या लेकरांना घेऊन किल्ल्यावर गेल्या. या घटनेची माहिती मिळताच अश्विनी यांच्या आई वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली. व्हंताळ गावचे सरपंचही यावेळी पोहोचले. पोलिस या प्रकरणात अधिकचा तपास करत आहेत. अश्विनी यांच्या मनात नक्की काय सुरू होते, हे यावरून स्पष्ट दिसते.

काही महिन्यांपूर्वीच अश्विनी यांनी मुंबईतील नोकरी सोडली होती. मुंबईतील नोकरी सोडून त्या मागील तीन महिन्यांपासून आपल्या माहेरीच राहत होत्या. यावेळी सासरच्या मंडळींकडून त्यांना त्रास दिला जात होता. अश्विनी यांचा पती रिक्षाचालक असल्याची माहिती मिळतंय. मुंबईतील नोकरी सोडण्यासाठी दबाव पतीनेच टाकल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात पोलिस तपास करत आहेत. सासरच्या चार लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत.

Follow Us
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?