AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mansoon Rain: महाराष्ट्रात पुढील आठवडा पावसाचा, कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट, आयएमडी अपडेट काय?

Rain in Maharashtra: उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा वाहणार आहे. त्याचा वेग 40-50 किमी प्रतितास असणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mansoon Rain: महाराष्ट्रात पुढील आठवडा पावसाचा, कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट, आयएमडी अपडेट काय?
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 23, 2024 | 4:03 PM
Share

महाराष्ट्रात आता मान्सून सक्रीय होणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. एक आठवडा पावसाने ब्रेक घेतल्यानंतर आता पुढील आठवड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. २३ ते २७ जून दरम्यान महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात यलो अन् ऑरेंज अलर्ट दिला आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा वाहणार आहे. त्याचा वेग 40-50 किमी प्रतितास असणार आहे. यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विदर्भात मान्सून दाखल

विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात मान्सून दाखल झाला होता. यंदा कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि पुणे या भागात मान्सून वेळेआधीचा आला. त्यानंतर विदर्भात पोहचण्याआधी सात दिवस पावसाने ब्रेक घेतला.अखेर मान्सून नागपुरात २२ जून रोजी दाखल झाला. हवामान खात्याकडून नागपूरसह मान्सून विदर्भात दाखल झाल्याची घोषणा केली. नागपुरात मान्सूनच्या आगमनाची तारीख 16 जून होती मात्र 5 दिवसांच्या विलंबाने मान्सून दाखल झाला.

नागपुरात तीन, चार दिवसांत मुसळधार

केरळनंतर कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बहुतेक भागात मान्सून यापूर्वीच दाखल झाला होता. पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने खरीप पेरणीला गती येणार आहे. बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने मान्सूनच्या ढगांनी जोर पकडला.पुढील तीन ते चार दिवस नागपुरात चांगला पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण

वाशिममधील कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरातील आठ दिवसांपासून रुसलेला पाऊस पुन्हा झाला. पेरणी केलेल्या पिकांना मिळाली नवसंजीवनी परिसरातील शेतकरी वर्ग आनंदाच वातावरण आहे. राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केले. मागील वर्षी दुष्काळ राज्यात होता. परंतु यंदा चांगला पाऊस असल्यामुळे शेतकरी वर्गात आशादायी वातावरण आहे.

कल्याण डोंबिवलीत विजेच्या कडकडाट सहमुसळधार पावसाला रविवारी दुपारी चार वाजता सुरुवात झाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून अचानक मुसळधार पाऊस पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

Follow Us
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल