AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नासाठी कोणी पोरगीही देत नाही, तुम्ही…, तरुण शेतकऱ्याचा थेट बांधावरून कृषी मंत्र्यांना फोन, पहा भरणे नेमकं काय म्हणाले?

एका तरुण शेतकऱ्याने कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन करून आपल्या व्याथा मांडल्या आहेत. या शेतकऱ्याने थेट बांधावरून कृषी मंत्र्यांना फोन केला, यावेळी त्यांनी देखील या तरुणाशी संवाद साधला.

लग्नासाठी कोणी पोरगीही देत नाही, तुम्ही..., तरुण शेतकऱ्याचा थेट बांधावरून कृषी मंत्र्यांना फोन, पहा भरणे नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्याचा भरणे यांना फोन Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 12, 2026 | 10:02 PM
Share

राज्यात एकीकडे राजकीय घडामोडींचा धुरळा उडत असताना, दुसरीकडे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक तरुण शेतकऱ्याने थेट शेताच्या बांधावरून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन लावून आपली व्यथा मांडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून प्रयत्न केल्यानंतर अखेर रविवारी या शेतकऱ्याचा  संपर्क कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी झाला. यावेळी त्याने शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. अशोक माने, असं या शेतकऱ्याचं नाव आहे.

आष्टी भागात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशोक माने यांनी संवादादरम्यान स्पष्ट केले की, निसर्गाच्या लहरीपणामुळे पिके तर हातातून गेलीच आहेत, पण या संकटामुळे सामाजिक प्रश्नही गंभीर बनले आहेत. पाऊस नाही, पिके नाहीत, त्यामुळे मुलांची लग्नंही जमेनाशी झाली आहेत, अशी व्यथा त्यांनी यावेळी कृषी मंत्र्यांसोबत बोलताना मांडली. त्यामुळे  सरकारने आता अटी-शर्तींच्या नावाखाली शेतकऱ्यांची पिळवणूक न करता, सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी यावेळी अशोक माने यांनी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.

दरम्यान यावेळी अशोक माने यांच्यासोबत फोनवर बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं की,   एक चांगली कर्जमाफी झाली आहे, मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले पाहिजेत, 40 हजार कोटींची कर्जमाफी असल्या अडचणीच्या काळात करण्यात आली आहे.  कुठलीही निवडणूक समोर नाहीये, तरी मोठी कर्जमाफी या ठिकाणी करण्यात आली. हा सरकारचा मोठा निर्णय आहे. याने सगळ्या शेतकऱ्यांचे समाधान होणार नाही, कारण शेतकरी अडचणीत आहेत, मी देखील एक शेतकी आहे, असं भरणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. जे शेतकरी नियमित कर्जाची परत फेड करतात त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे अनुदान आतापर्यंत देण्यात येत होते, मात्र त्यांना देखील आता दोन लाखांपर्यंतचं अनुदान मिळणार आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा