AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंदिर, रेस्टॉरंट मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा विचार, लोकल रेल्वेबाबत निर्णय नाही

येत्या काही दिवसात रेस्टॉरंट आणि मंदिरं मर्यादित क्षमतेनं सुरु करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. temples and restaurant may open soon)

मंदिर, रेस्टॉरंट मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा विचार, लोकल रेल्वेबाबत निर्णय नाही
| Updated on: Sep 11, 2020 | 11:27 AM
Share

मुंबई : येत्या काही दिवसात रेस्टॉरंट आणि मंदिरं मर्यादित क्षमतेनं सुरु करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. येत्या 3 ते 4 दिवसात याबाबतचा ठोस निर्णय होण्याची चिन्हं आहेत. असं असलं तरी मुंबईकरांना लोकल रेल्वेसाठी अद्याप वाट पाहावी लागणार आहे. कारण लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकार अद्याप तयार नसल्याचं कळतंय. (temples and restaurant may open soon)

दरम्यान राज्यातील मंदिरांसाठी ई-दर्शनाच्या माध्यमातून मर्यादित संख्येनं देवदर्शन करता येऊ शकेल, अशी पद्धत अवलंबण्याबाबत टास्क फोर्समध्ये चर्चा झाली. ई-दर्शन किंवा मंदिरात जाण्याची वेळ बूक करता येऊ शकेल, त्यानुसार मंदिरातील गर्दी टाळता येईल.

रेस्टॉरंटमध्ये पार्सलव्यक्तिरिक्त 10 टक्के क्षमतेची बैठक व्यवस्था अर्थात सीटिंग अरेंजमेंटमध्ये रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत विचार आहे.

लोकल रेल्वे वेटिंगवर

मुंबईतील लोकल सुरु होण्यास अजून वाट बघावी लागणार आहे. जोपर्यंत मुंबईच्या आजूबाजूचा परिसर, एमएमआर भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नाही, तोपर्यंत मुंबईतील लोकल सुरु होण्याची शक्यता कमी आहे.

शाळा सुरु करण्यासंदर्भातही टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झाली, मात्र अद्याप कोणताही निर्णय नाही. लोकलप्रमाणेच शाळा सुरु होण्यासही काही काळ वाट बघावी लागणार आहे.

कोरोना संकटामुळे राज्यात 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉकिंग आणि मिशन बिगिन अंतर्गत अनेक सेवा सुरळीत झाल्या. मात्र मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल रेल्वे अजूनही बंद आहे. त्याचा ताण रस्ते वाहतुकीवर पडत आहे. त्यामुळे मुंबईकर ट्रॅफिक जॅमने हैराण झाले आहेत.

(temples and restaurant may open soon)

संबंधित बातम्या 

Maharashtra Mission Begin Again | केंद्राची परवानगी, मात्र महाराष्ट्रात हॉटेल-प्रार्थनास्थळांवर बंदी कायम 

Maharashtra Mission Begin Again | तीन टप्प्यात शिथिलता येणार, कोणत्या टप्प्यात काय सुरु? 

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.