Corona | शाळा बंद करण्याची अवस्था नाही, एकही क्रिटिकल पेशंट नाही, IPL आयोजकांसमोर 2 पर्याय : आरोग्य मंत्री

कोरोनामुळे घाबरु नका, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केलं आहे.

Corona | शाळा बंद करण्याची अवस्था नाही, एकही क्रिटिकल पेशंट नाही, IPL आयोजकांसमोर 2 पर्याय : आरोग्य मंत्री
Follow us
| Updated on: Mar 11, 2020 | 8:25 PM

मुंबई : कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे (Health Minister Rajesh Tope). पुण्यापाठोपाठ आता मुंबईतही 2 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, कोरोनामुळे घाबरु नका, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केलं आहे. कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचीदेखील माहिती रोजेश टोपे यांनी दिली. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (11 मार्च) तज्ज्ञ डॉक्टरांसोबत मुंबईतील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये बैठक झाली”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

‘शाळांना तूर्तास सुट्टी देण्याची गरज नाही’

“कोरोनाबाबत जास्त काळजी करु नये. मात्र सतर्कता बाळगावी. आपली रोगप्रतिकार क्षमता वाढली तर आपोआप या आजारातून सुटका होते. या आजारावरील मृत्यूदर 2.5 टक्के आहे. या आजाराच्या एकही रुग्णाची प्रकृती क्रिटिकल नाही. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. बैठकीत शाळांच्या बाबतीतही चर्चा झाली. याबाबच सर्व तज्ज्ञांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यामध्ये हिंदूजा, जसलोक, लिलावती अशा विविध रुग्णालयाचे तज्ज्ञ होते. शाळांना तूर्तास सुट्टी देण्याची गरज नाही. त्याने भीतीचे वातावरण वाढेल. त्यामुळे तूर्तास कोणत्याही शाळेला सुट्टी दिली जाणार नाही”, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

हेही वाचा : कोरोनाची मुंबईत एन्ट्री, महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 7 वर

‘लॅबची संख्या वाढवणार’

“मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॅबची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर, मुंबई आणि पुणे या तीन ठिकाणी सध्या लॅब आहेत. मात्र, कोरोना बाधितांची संख्या वाढत असेल तर लॅब वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे आम्ही रॅनबॅक्सी लॅब, एसआरएल लॅब आणि औरंगाबादचं मेडीकल कॉलेज या तीन-चार ठिकाणी लॅब वाढवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं राजेश टोपे म्हणाले.

‘आयपीएल संदर्भात दोन भूमिका’

दरम्यान, कोरोनामुळे आयपीलचं वेळापत्रक पुढे ढकलणार अशी चर्चा सुरु होती. याबाबत राजेश टोपे यांना विचारले असता, “आयपीएल संदर्भात दोन भूमिका आहेत. एकतर सामने होतील, मात्र गॅलरी पासेस दिले जाणार नाहीत. घरी बसून थेट प्रक्षेपण पाहता येईल किंवा आयपीएलचे सामने पुढे ढकलण्यात यावा, अशा दोन भूमिका आहे. त्यावरती अद्याप निर्णय झालेला नाही”, असं राजेश टोपे म्हणाले. याशिवाय राज्यात कुठल्याही प्रकारचा मोठा समारंभ होणार नाही, असा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

“मुंबईत दोन जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. वीणा वर्ल्डसोबत दुबईत जो ग्रूप गेला होता त्याच गृपमधील ते आहेत. पुण्यातले जे 4 आहेत त्यांच्यासोबत आणखी 2 जणांची संख्या वाढली आहे. याशिवाय आणखी एकावर तसे लक्षण दिसून आले आहेत. मात्र, तो बाधित नाही. त्याचीही तपासणी करण्यात आली आहे”, अशीदेखील माहिती राजेश टोपे यांनी दिली.

संबंधित बातमी : खोकायचं कसं, शिंकायचं कसं? हात स्वच्छ धुणे म्हणजे नेमकं काय? पुणे विभागीय आयुक्तांच्या सोप्या टिप्स

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.