AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्री राजेंद्र शिंगणे यांची मेडिकलवर धाड, ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार रोखण्यासाठी धडक

राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज (10 जुलै) भायखळा येथील मेडिकल दुकानावर धाड टाकली (Minister Rajendra Shingane raid on medical).

मंत्री राजेंद्र शिंगणे यांची मेडिकलवर धाड, 'रेमडेसिवीर'चा काळाबाजार रोखण्यासाठी धडक
| Updated on: Jul 10, 2020 | 3:35 PM
Share

मुंबई : राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी आज (10 जुलै) भायखळा येथील मेडिकल दुकानावर धाड टाकली (Minister Rajendra Shingane raid on medical). त्यांच्याकडे कोरोना उपचारात प्रभावी औषध ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी भायखळ्यात मेडिकलमध्ये जाऊन औषधांची पाहणी केली (Minister Rajendra Shingane raid on medical).

“रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबजार होत असल्याच्या तक्रारी गेल्या दोन दिवसांपासून अन्न आणि औषध प्रशासनाकडे येत होत्या. काही वृत्तपत्रांमध्येही तक्रारी छापून आल्या होत्या. तर काहींनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यालयात प्रत्यक्ष फोन करुन तक्रारी केल्या. त्याअनुषंगाने कालपासूनच मुंबई महापालिकेत, रुग्णालयांमध्ये आणि बाजारात हे औषध किती उपलब्ध आहे, याचा आढावा घेतला जात आहे”, अशी माहिती राजेंद्र शिंगणे यांनी दिली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

“रेमडेसिवीर इंजेक्शनची खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार मेडिकल दुकानदारांनी रुग्णाचं आधारकार्ड, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि फोन नंबर या सर्व गोष्टींची नोंद करुन औषध देणं जरुरीचं आहे. या नियमावलीनुसार मेडिकलचे मालक औषधांची विक्री करतात का, ते तपासलं जात आहे”, असं मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं.

“आज सकाळपासून मुंबईतील विविध मेडिकलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक किती आहे. त्यांनी किती रुपयांना इंजेक्शन खरेदी केले. याबाबत माहिती घेतली जात आहे”, असं मंत्री राजेंद्र शिंगणे म्हणाले.

हेही वाचा : पुणे जिल्हा पुन्हा लॉकडाऊन, अजित पवारांची घोषणा

“मोडिकल्समध्ये सध्या रेमेडिसीवर इंजेक्शनचा स्टॉक कमी आहे, ही वस्तुस्थिती आहे. औषध पुरवणाऱ्या कंपन्यांनी दोन दिवसात पूर्ण औषध पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे. औषध छापील किंमतीतच विकलं गेलं पाहिजे. काळाबाजारा व्हायला नको. याबाबत मी आणि गृहविभाग मिळून योग्य ती कारवाई करु”, असं राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मंत्री राजेंद्र शिंगणे यांची आज दुपारी एक वाजता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

रेमडेसीवीर इंजेक्शन तुटवडा असल्याने हे औषध ज्यादा दराने विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारीअन्न आणि औषध प्रशासनाकडे आल्या आहेत. रेमडेसीवीर औषधांचा काळाबाजार फक्त मुंबईतच नाही तर देशभरात होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने सर्व राज्यांच्या औषध प्रशासनाला याविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा : Corona in India | देशात कोरोना रुग्णसंख्येत सर्वात मोठी वाढ, कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखाच्या दिशेने

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.