AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल

मुंबईसह उपनगर, नवी मुंबई, ठाण्यातील अनेक भागात वीज प्रवाह अचानकपणे खंडित झाल्याची घटना घडली आहे. (Mumbai Power Cut in all area) 

Mumbai Power Cut | मुंबई-ठाणे थांबले; पहिल्यांदाच सर्वाधिक वेळ बत्तीगुल
| Updated on: Oct 12, 2020 | 11:06 AM
Share

मुंबई : मुंबईसह उपनगर, नवी मुंबई, ठाण्यातील अनेक भागात वीज प्रवाह अचानकपणे खंडित झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील लालबाग, परळ, अंधेरी, दादर, ठाणे, वडाळा या भागातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. ग्रीड फेल्युअरमुळे हा बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या तासाभरापासून मुंबईत लाईट नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत सर्वाधिक जास्त वेळ लाईट जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Mumbai Power Cut in all area)

मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक लोकल ट्रेन या जागच्या जागी थांबल्या आहेत. गेल्या 15 मिनिटात रेल्वे गाड्यात ताटकळत उभ्या आहेत. यामुळे अत्यावश्यक आणि शासकीय सेवेतील कर्मचारी लोकलमध्ये अडकले आहे.

मुंबई लोकलला फटका

मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबईतील उपनगरीय लोकल सेवेला याचा फटका बसला आहे. मुंबईत वीजपुरवठा खंडीत झाल्याने पश्चिम, मध्य या रेल्वेला फटका बसत आहे. कामावर जाण्यासाठी निघालेले अनेक चाकरमानी रेल्वेत खोळंबले आहे. लोकलमधील वीज आणि पंखे बंद आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना आता वीज खंडीत झाल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

सिग्नल यंत्रणा बंद

मुंबईतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणाही ठप्प झाल्या आहे. रस्त्यावरील सर्वच ठिकाणच्या सिग्नल हे बंद पडले आहेत. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी ट्राफिक जाम होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

रुग्णालय, परीक्षांना फटका

मुंबईतील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णालयांना याचा फटका बसला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर किंवा इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता आहे. अनेक रुग्णालयांकडे पावर बॅक अप आहे का, जनरेटर आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे.

तर दुसरीकडे ऑनलाईन परीक्षांनाही याचा फटका बसला आहे. काही विद्यार्थ्यांना अंधारात, तसेच प्रचंड उकाड्यात पेपर द्यावा लागत आहे.(Mumbai Power Cut in all area)

मुंबईत कोणकोणत्या भागात वीज गायब?

दादर लालबाग परळ प्रभादेवी वडाळा ठाणे नवी मुंबई पनवेल बोरिवली मालाड कांदिवली

बत्ती गुल, सर्व काही जागच्या जागी थांबलं मुंबईची बत्ती गुल झाल्यामुळे सर्व काही जागच्या जागी थांबलं. वीजेअभावी रेल्वेच्या तिन्ही लाईन ठप्प झाल्या. तीनही मार्गावरील लोकल आहे त्या ठिकाणी थांबल्या. नेमक्या लोकल का थांबल्या हे प्रवाशांनाही काहीवेळ समजत नव्हतं.

संबंधित बातम्या :

mumbai power cut ! मुंबई-ठाण्यातील बत्तीगुल झाल्याने रेल्वे, इंटरनेट ठप्प; रुग्णालयांनाही फटका

Mumbai Power Cut: मुंबईची बत्ती गुल; कार्यालये आणि रेल्वे वाहतूक ठप्प

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....