AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fake Message Alert | मुंबई पोलिसांच्या नावे फेक मेसेज व्हायरल, दोघं बाहेर पडल्यास अटक होण्याचे दावे खोटे

मुंबई पोलिसांकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा आणि खोटे मेसेज आपले मित्र, नातेवाईक यांना फॉरवर्ड करु नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे

Fake Message Alert | मुंबई पोलिसांच्या नावे फेक मेसेज व्हायरल, दोघं बाहेर पडल्यास अटक होण्याचे दावे खोटे
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Jun 30, 2020 | 7:52 AM
Share

मुंबई : मुंबईत नवे नियम लागू झाल्याचे खोटे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र कुठल्याही अफवा पसरवणाऱ्या फेक मेसेजवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी मुंबईकरांना केलं आहे. (Mumbai Police Warns not to believe Fake Message on Social Media about New Guidelines)

मुंबई पोलिसांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या खोट्या मेसेजविषयी खुद्द मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती दिली आहे. आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दोघं जण बाहेर पडल्यास त्यांना अटक होण्याचे दावे खोटे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

काय आहेत फेक मेसेजमधील खोटे दावे?

-“कोणतीही आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी केवळ एका व्यक्तीस बाहेर जाण्याची परवानगी, त्यानंतर बाहेर जाणार्‍यास अटक केली जाईल”

-“सोसायटी आणि जवळपासच्या परिसरात देखील फिरण्याची परवानगी नाही”

-“ज्येष्ठ नागरिक एकटेच राहिल्यास कृपया मुंबईला *पोलिस नंबर* वर कॉल करा”

-“जर एखादी व्यक्ती आवश्यक वस्तू खरेदीसाठी वाहन वापरताना आढळली, तर त्यांचे वाहन जप्त केले जाईल”

हेही वाचा : मुंबईत विनामास्क फिरल्यास 1 हजार रुपये दंड, पालिकेचा निर्णय

फेक मेसेजमध्ये धादांत खोटे दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे. असे मेसेज आपले मित्र, नातेवाईक किंवा प्रियजनांना फॉरवर्ड न करण्यासही पोलिसांनी बजावले आहे.

दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईत मास्क लावण्याचे बंधन कायम आहे. जर कोणी मुंबईत विनामास्क फिरताना आढळले, तर त्याच्याकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक ठिकाणी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करताना देखील प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानले जाईल.

संबंधित बातम्या :

Lockdown Extension | कन्फ्युजन नको, 31 जुलैपर्यंत वाढवलेल्या लॉकडाऊनबद्दल सर्व काही

लॉकडाऊन वाढवल्यानंतर टप्प्याटप्याने शिथीलता, राज्यात काय सुरु, काय बंद?

(Mumbai Police Warns not to believe Fake Message on Social Media about New Guidelines)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक