AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चोरी करून पोलीस स्टेशनबाहेरच गाणी ऐकत होता चोर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने घेतलं ताब्यात

कोरोना काळात दुकाने बंद होता त्याच्या फायदा चोरट्याने घेत कोपरखैरणे आणि तळोजा इथे दुकानात घरफोडीच्या घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या.

चोरी करून पोलीस स्टेशनबाहेरच गाणी ऐकत होता चोर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने घेतलं ताब्यात
| Edited By: | Updated on: Oct 20, 2020 | 6:52 AM
Share

नवी मुंबई : नवी मुंबईत घरफोडी प्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या तिसऱ्या साथीदाराचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोरांकडून 1 लाख 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोरोना काळात दुकाने बंद होता त्याच्या फायदा चोरट्याने घेत कोपरखैरणे आणि तळोजा इथे दुकानात घरफोडीच्या घटना काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या. (Navi Mumbai police arrested two burglars)

या गुन्ह्यात सराईत सोनसाखळी चोराचा समावेश असल्याची शक्यता होती. त्यानुसार गुन्हे शाखा 1 चे पथक गुन्हेगारांच्या मागावर होते. यादरम्यान काही संशयित गुन्हेगार तुर्भे रेल्वेस्थानक जवळ येणार असल्याची माहिती हवालदार बालाजी चव्हाण आणि संतोष मिसाळ यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सुभाष निकम यांनी सहायक निरीक्षक राहुल राख, रुपेश नाईक, हर्षल कदम, हवालदार रोहिदास पाटील, बालाजी चव्हाण, शशिकांत जगदाळे, संतोष मिसाळ, धनाजी भांगरे व दिपक मोरे यांचे पथक करण्यात आले होते.

या पथकाने रविवारी तुर्भे स्थानकाबाहेर सापळा रचला होता. यावेळी दोघेजण त्याठिकाणी एक गोणी घेऊन संशयास्पद वावरताना आढळून आले. यामुळे पथकाने त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडील गोणीमध्ये चोरीचे मोबाईल व कपडे आढळून आले. (Navi Mumbai police arrested two burglars)

तळोजा येथील उमेर अहमद बाऊद्दीन व कोपरखैरणेतील अविनाश कोरडे यांच्या दुकानातून त्यांनी हा माल चोरल्याची त्यांनी कबुली दिली. यानुसार त्यांच्याकडून 1 लाख 17 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस सह आयुक्त डॉ. बी. जी. शेखर यांनी दिली. त्यात 52 मोबाईल, स्पीकर, हेडफोन तसेच कपड्यांचा समावेश आहे.

याप्रकरणी चोरांना अटक करण्यात आलं असून रिझवान खान (28) व जावेद शेख (22) अशी आरोपींची नावे आहेत. तर त्यांचा तिसरा साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दोघेही कल्याण परिसरात राहणारे असल्याचे सह आयुक्त शेखर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोपरखैरणे इथल्या अविनाश कोरडे यांनी कर्ज काढून नवीनच कपड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. अशातच घरफोडी झाल्याने त्यांच्यावर संकट कोसळलं होतं. परंतु गुन्हे शाखा पोलिसांनी वेळीच या गुन्ह्याची उकल करून काही प्रमाणात चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक आरोपींकडून पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल असून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती नवी मुंबईचे अतिरिक्त आयुक्त बि. जि.शेखर यांनी दिली.

इतर बातम्या – 

IPL 2020 | संथ खेळीमुळे केदार जाधव सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल, मीम्सचा पाऊस
‘तुझ्या बापाचा नोकर नाही’, रात्री 10 वाजता फोन करणाऱ्या मद्यतस्करावर वरुण गांधी भडकले

(Navi Mumbai police arrested two burglars)

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.